शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

२५ गावांत प्रचार ‘पाण्या’भोवतीच

By admin | Updated: February 16, 2017 02:44 IST

तालुक्यातील सुपे-मेडद जिल्हा परिषद गटातील प्रचार पाण्याभोवतीच फिरत आहे. उपसा सिंचन योजना होऊनदेखील २५ वर्षांनंतरदेखील

बारामती : तालुक्यातील सुपे-मेडद जिल्हा परिषद गटातील प्रचार पाण्याभोवतीच फिरत आहे. उपसा सिंचन योजना होऊनदेखील २५ वर्षांनंतरदेखील पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. त्यावर अडीच वर्षांच्या काळात वीजपुरवठा, नदीतून वाहून जाणारे पाणी अडवून जादा आवर्तन देण्याचा प्रयत्न झाला आहे, असे भाजपाकडून निवडणूक प्रचारात सांगितले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात योजना या भागासाठी वरदान ठरणारे आहे. आता कारखान्यांच्या मार्फत योजना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी ग्वाही दिली जात आहे.या गटात भाजपाने जोरदार आव्हान दिले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना हात घालून जवळपास २५ गावे, वाड्यावस्त्यांवर होत असलेला प्रचार पाण्याभोवती फिरत आहे. आता काहीही करा; पण पाण्याचा प्रश्न मिटवा, अशीच मागणी गावागावांतील ग्रामस्थांकडून केली जात आहे. योजनेला २५ वर्षे झाली; परंतु अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा पुढे करून भाजपाने गावोगावी पाणीप्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या गटात मागील निवडणुकीत जोरदार लढत झाली होती. पंचायत समिती गणाची जागा भाजपाने जिंकली होती. तर, जिल्हा परिषद आणि एक गण राष्ट्रवादीने जिंकला होता. आता दोन गट वगळता अन्य ४ गटांमध्ये तुल्यबळ उमेदवार विरोधकांनीदेखील दिले आहेत. शिवसेना, मनसे, बसपाचे उमेदवारदेखील रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. सुपे-मेडद गट सध्या लक्षवेधी ठरला आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, तसेच कारखान्यांमार्फत सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवू, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. आरोप-प्रत्यारोप होत असताना या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपाचे दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे भरत खैरे, शिवसेनेचे सचिन बोरकर, काँग्रेसचे संजय चांदगुडे अशी बहुरंगी लढत आहे. (वार्ताहर)