शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

२५ गावांत प्रचार ‘पाण्या’भोवतीच

By admin | Updated: February 16, 2017 02:44 IST

तालुक्यातील सुपे-मेडद जिल्हा परिषद गटातील प्रचार पाण्याभोवतीच फिरत आहे. उपसा सिंचन योजना होऊनदेखील २५ वर्षांनंतरदेखील

बारामती : तालुक्यातील सुपे-मेडद जिल्हा परिषद गटातील प्रचार पाण्याभोवतीच फिरत आहे. उपसा सिंचन योजना होऊनदेखील २५ वर्षांनंतरदेखील पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. त्यावर अडीच वर्षांच्या काळात वीजपुरवठा, नदीतून वाहून जाणारे पाणी अडवून जादा आवर्तन देण्याचा प्रयत्न झाला आहे, असे भाजपाकडून निवडणूक प्रचारात सांगितले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात योजना या भागासाठी वरदान ठरणारे आहे. आता कारखान्यांच्या मार्फत योजना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी ग्वाही दिली जात आहे.या गटात भाजपाने जोरदार आव्हान दिले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना हात घालून जवळपास २५ गावे, वाड्यावस्त्यांवर होत असलेला प्रचार पाण्याभोवती फिरत आहे. आता काहीही करा; पण पाण्याचा प्रश्न मिटवा, अशीच मागणी गावागावांतील ग्रामस्थांकडून केली जात आहे. योजनेला २५ वर्षे झाली; परंतु अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा पुढे करून भाजपाने गावोगावी पाणीप्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या गटात मागील निवडणुकीत जोरदार लढत झाली होती. पंचायत समिती गणाची जागा भाजपाने जिंकली होती. तर, जिल्हा परिषद आणि एक गण राष्ट्रवादीने जिंकला होता. आता दोन गट वगळता अन्य ४ गटांमध्ये तुल्यबळ उमेदवार विरोधकांनीदेखील दिले आहेत. शिवसेना, मनसे, बसपाचे उमेदवारदेखील रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. सुपे-मेडद गट सध्या लक्षवेधी ठरला आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, तसेच कारखान्यांमार्फत सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवू, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. आरोप-प्रत्यारोप होत असताना या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपाचे दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे भरत खैरे, शिवसेनेचे सचिन बोरकर, काँग्रेसचे संजय चांदगुडे अशी बहुरंगी लढत आहे. (वार्ताहर)