शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन द्या

By admin | Updated: May 9, 2017 03:24 IST

कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटेठाण : कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे. यापासून इथेनॉलनिर्मिती चांगली होऊ शकते, म्हणूनच यापासून इथेनॉल तयार केले तर महागड्या पेट्रोलियमवर होणारे हजारो कोटी रुपये वाचण्यास मदत होईल. तीच रक्कम वीज व पाण्यावर खर्च केली तर पाण्याविना पडीक असलेल्या शेतजमिनीतूनदेखील चांगले उत्पादन घेता येईल. इथेनॉलनिर्मिती व वापराबाबत प्रोत्साहन दिल्यास प्रचलित दरापेक्षा स्वस्त दराने इंधन उपलब्ध होऊन सर्वांगीण विकासाला चालना देत नव्या इंधनप्रणालीचा नवा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पाटेठाण (ता. दौंड) येथे प्राज कंपनीनिर्मित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या देशातील दुसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या शेतातील काडीकचरा, तुरीच्या पराट्या इत्यादीपासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की आपल्याकडे मळी (मोलॅसीस) पासून इथेनॉल उत्पादन होत असून याबरोबरच आता मका, गहू, बांबू यापासूनदेखील इथेनॉलनिर्मिती शक्य होणार आहे. ब्राझील, अमेरिका, कॅनडा या देशात शेती उत्पादनातून थेट इथेनॉलचे उत्पादन वीस टक्क्यांपासून शंभर टक्केपर्यंत होत असून तेथे नव्या वाहनात शंभर टक्के, तर जुन्या वाहनांमध्ये तीस टक्के इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे. म्हणूनच गावोगावी मका, ऊस, धान, बगॅस, बीट तसेच सुमारे एकशे सत्तावीस जाती विकसित असलेल्या बांबूपासूनदेखील इथेनॉल प्रकल्प उभे केले जाणार असून यामुळे गावागावांमध्ये लाखो युवकांना रोजगारनिर्मिती होऊन देश प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी प्रमोद चौधरी, कारखान्याचे उपाध्यक्ष बबनराव गायकवाड, अ‍ॅड. विकास रासकर, नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, किसन शिंदे, माधव राऊत, पांडुरंग कदम, तहसीलदार विवेक साळुंखे उपस्थित होते.