शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन द्या

By admin | Updated: May 9, 2017 03:24 IST

कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटेठाण : कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे. यापासून इथेनॉलनिर्मिती चांगली होऊ शकते, म्हणूनच यापासून इथेनॉल तयार केले तर महागड्या पेट्रोलियमवर होणारे हजारो कोटी रुपये वाचण्यास मदत होईल. तीच रक्कम वीज व पाण्यावर खर्च केली तर पाण्याविना पडीक असलेल्या शेतजमिनीतूनदेखील चांगले उत्पादन घेता येईल. इथेनॉलनिर्मिती व वापराबाबत प्रोत्साहन दिल्यास प्रचलित दरापेक्षा स्वस्त दराने इंधन उपलब्ध होऊन सर्वांगीण विकासाला चालना देत नव्या इंधनप्रणालीचा नवा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पाटेठाण (ता. दौंड) येथे प्राज कंपनीनिर्मित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या देशातील दुसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या शेतातील काडीकचरा, तुरीच्या पराट्या इत्यादीपासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की आपल्याकडे मळी (मोलॅसीस) पासून इथेनॉल उत्पादन होत असून याबरोबरच आता मका, गहू, बांबू यापासूनदेखील इथेनॉलनिर्मिती शक्य होणार आहे. ब्राझील, अमेरिका, कॅनडा या देशात शेती उत्पादनातून थेट इथेनॉलचे उत्पादन वीस टक्क्यांपासून शंभर टक्केपर्यंत होत असून तेथे नव्या वाहनात शंभर टक्के, तर जुन्या वाहनांमध्ये तीस टक्के इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे. म्हणूनच गावोगावी मका, ऊस, धान, बगॅस, बीट तसेच सुमारे एकशे सत्तावीस जाती विकसित असलेल्या बांबूपासूनदेखील इथेनॉल प्रकल्प उभे केले जाणार असून यामुळे गावागावांमध्ये लाखो युवकांना रोजगारनिर्मिती होऊन देश प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी प्रमोद चौधरी, कारखान्याचे उपाध्यक्ष बबनराव गायकवाड, अ‍ॅड. विकास रासकर, नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, किसन शिंदे, माधव राऊत, पांडुरंग कदम, तहसीलदार विवेक साळुंखे उपस्थित होते.