शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला जाळले

By admin | Updated: September 22, 2015 03:03 IST

जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले.

टाकळी हाजी : जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले. शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण निंबाळकर व उपनिरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १२च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सख्ख्या भावासह त्यांची मुले व नातेवाइकांसह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार आहेत. नाथू सोमा मोटे (भाऊ) वय ५५, सचिन नाथू मोटे (२७), आशिष नाथू मोटे (२३), योगेश शिवाजी मोटे (२२), सुखदेव नाना मोटे (५५), कमल नाथू मोटे, योगश शिवाजी मोटे, रंजना शिवाजी मोटे, सुनंदा बाबाजी लंघे (सर्व रा. संविदणे) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. अभिमन्यू सुरेश मोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाथू, सुरेश व शिवाजी मोटे हे तीन भाऊ होते. यांच्यामध्ये पावणेदोन एकर जमिनीवरून सारखे वाद होत होते. सुरेश यांनी याबाबत पोलिसांत तक्रारदेखील केली होती. त्यांची आई झुंबराबाई हिने तिच्या नावावरची जमीन सुरेशला दिली म्हणून नाथू व शिवाजीच्या मुलांना सुरेशचा राग होता. रात्री सुरेश मोटे हे घराबाहेर एकटे झोपले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून, ते नव्यानेच पोलीस दलात दाखल झाले आहेत. ते नाशिक येथे कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला असल्यामुळे सुरेशची पत्नी गंगूबाई मुलांकडे नाशिकला गेली होती. त्यामुळे मयत सुरेश हे एकटेच घरी होते. झोपेतच त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्यावर घरासमोरच त्यांना पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. सकाळी ८ च्या सुमारास शेजारील वस्तीवरील तरुण सुनील पोपट शिंदे हे शेताकडे जात असताना त्यांनी मृतदेह जळत असल्याचे पाहिले व ते सुरेश यांच्या घराकडे गेले. त्या वेळी मृतदेह अर्ध्यापेक्षा जास्त जळून गेला होता. शिरूरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, रामदास वाकोडे घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा केला. (वार्ताहर)