शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा नोंदीसाठी वीरनाला प्रकल्पग्रस्तांचा जलसमाधीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिंचे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीरनजीक संगम जलाशय (वीर नाला) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परिंचे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीरनजीक संगम जलाशय (वीर नाला) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीत वीर येथील स्थानिक शेतकरी राजेंद्र विलास धुमाळ यांच्याकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध तसेच महसूल विभाग यांच्याकडून करण्यात येणाऱ्या फसवणुकीबाबत सोमवारी (दि.२८) पुरंदर तहसील कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

वीर नाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वीर येथील घोडेउड्डाण हद्दीत पुनर्वसन केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ३० एकर जमिनीतील सात एकर जमिनींचा महसूल विभागाकडून परस्पर बेकायदेशीरपणे लिलाव करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ३० वर्षे झाले, तरी अजून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ७/१२ उताऱ्यावर नोंद झाली नाही. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांच्याकडून, तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांना अतिक्रमण करून वारंवार त्रास दिला जात आहे. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे लेखी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

महसूल विभागाकडून या पुनर्वसनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. ३० वर्षांपासून राऊतवाडी येथील शेतकरी शासना विरोधात लढा देत आहेत. आमच्या मुलाबाळांचे भवितव्य धोक्यात असून आम्हाला न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा महिला शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबर जनावरांचे गोठे, फळबागा, विहिरी इत्यादी बाबींची कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी सांगितले. आदेशामध्ये असणाऱ्या परिशिष्टात असलेल्या यादीप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर तातडीने नाव नोंदणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी सांगितले.

राजेंद्र विलास धुमाळ यांना याबाबत विचारले असता राजकीय आकसापोटी माझ्यावर अरोप केले जात असून लघूपाटबंधारे विभागातर्फे नाल्यांना पुनर्वसन कायदा लागू नसल्याने वीर नाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत नाही. आमच्या जमिनी वीर धरण प्रकल्पासाठी संपादित केल्या होत्या. त्या जमिनी धरणाच्या कामी अतिरिक्त ठरल्या आहे. त्या जमिनी मूळ मालकांना भरपाईच्या दुप्पट रक्कम अदा करून परत केल्या आहेत. उर्वरित जमीन परत मिळविण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केले आहेत. वीर धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. वीर धरण प्रकल्प पूर्ण होऊन उर्वरित जमीन आमची असून ते आम्ही दुसऱ्यांना का देऊ, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

फोटो ; परिंचे (ता.पुरंदर) येथील वीरनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाबरोबर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.