शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा नोंदीसाठी वीरनाला प्रकल्पग्रस्तांचा जलसमाधीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिंचे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीरनजीक संगम जलाशय (वीर नाला) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परिंचे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीरनजीक संगम जलाशय (वीर नाला) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीत वीर येथील स्थानिक शेतकरी राजेंद्र विलास धुमाळ यांच्याकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध तसेच महसूल विभाग यांच्याकडून करण्यात येणाऱ्या फसवणुकीबाबत सोमवारी (दि.२८) पुरंदर तहसील कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

वीर नाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वीर येथील घोडेउड्डाण हद्दीत पुनर्वसन केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ३० एकर जमिनीतील सात एकर जमिनींचा महसूल विभागाकडून परस्पर बेकायदेशीरपणे लिलाव करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ३० वर्षे झाले, तरी अजून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ७/१२ उताऱ्यावर नोंद झाली नाही. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांच्याकडून, तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांना अतिक्रमण करून वारंवार त्रास दिला जात आहे. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे लेखी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

महसूल विभागाकडून या पुनर्वसनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. ३० वर्षांपासून राऊतवाडी येथील शेतकरी शासना विरोधात लढा देत आहेत. आमच्या मुलाबाळांचे भवितव्य धोक्यात असून आम्हाला न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा महिला शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबर जनावरांचे गोठे, फळबागा, विहिरी इत्यादी बाबींची कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी सांगितले. आदेशामध्ये असणाऱ्या परिशिष्टात असलेल्या यादीप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर तातडीने नाव नोंदणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी सांगितले.

राजेंद्र विलास धुमाळ यांना याबाबत विचारले असता राजकीय आकसापोटी माझ्यावर अरोप केले जात असून लघूपाटबंधारे विभागातर्फे नाल्यांना पुनर्वसन कायदा लागू नसल्याने वीर नाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत नाही. आमच्या जमिनी वीर धरण प्रकल्पासाठी संपादित केल्या होत्या. त्या जमिनी धरणाच्या कामी अतिरिक्त ठरल्या आहे. त्या जमिनी मूळ मालकांना भरपाईच्या दुप्पट रक्कम अदा करून परत केल्या आहेत. उर्वरित जमीन परत मिळविण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केले आहेत. वीर धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. वीर धरण प्रकल्प पूर्ण होऊन उर्वरित जमीन आमची असून ते आम्ही दुसऱ्यांना का देऊ, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

फोटो ; परिंचे (ता.पुरंदर) येथील वीरनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाबरोबर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.