शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गरिबी नष्ट होईल

By admin | Updated: February 11, 2017 02:55 IST

तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे.

पुणे : तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे देशातील गरिबी नष्ट होईल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच, समाजातील धर्म व जाती भेद मिटल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फिरोदिया बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, राजा ढाले, विद्या बाळ, मोहनराव देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, विश्वनाथ कराड यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाविद्यालये व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे आदी उपस्थित होते.फिरोदिया म्हणाले, ‘‘समाजात आजही एकमेकांमध्ये वाद व दुरावा दिसून येतो. मात्र, तंत्रज्ञानाचा वेग कोणालाही थांबविता येणार नाही. परिणामी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थिरता येईल. त्यासाठी सर्वांनी तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. तसेच, परदेशात जाऊन लोकांची चाकरी करण्यापेक्षा देशातच रोजगारनिर्मिती केली, तर देश वैभवाच्या शिखरावर जाईल.’’बाबा आढाव म्हणाले, ‘‘विद्यापीठाने झोपडीत राहणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाची ज्योत पोहोचविण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच, असंघटित कामगारांसाठी एक संस्था सुरू करायला हवी.’’अलीकडे राष्ट्रद्रोह हे कलम खूप सोपे झाले आहे. आम्हालाही ते लावले जाऊ शकते, अशी टीका करून विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘भेदाभेद पाडणाऱ्या संस्कृतीला बाजूला सारून विद्यापीठाने माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारे शिक्षण देण्यावर भर द्यावा.’’मनोहरराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. एकबोटे यांच्या वतीने डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पुरस्कार स्वीकारला.(प्रतिनिधी)