शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, प्रगतीसाठी संगीतशास्त्र लाभदायक

By admin | Updated: May 9, 2017 03:21 IST

स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद हरपून बसला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. यातून

स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद हरपून बसला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी माणसाने आपल्या कामकाजाच्या चाकोरीव्यतिरिक्त स्वत:च्या आरोग्य आणि प्रगतीसाठी कलात्मक छंद जोपासणे गरजेचे आहे, कलात्मक आविष्कारामुळे माणूस ताणतणावातून काही काळ मुक्त राहू शकतो. यासाठी संगीताची आवड गरजेची आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्र सांभाळून कलाक्षेत्रात कामकाज करणारे डॉ. विकास वैद्य यांनी व्यक्त केले.डॉ. विकास वैद्य म्हणाले, ‘‘संगीतशास्त्र हा असा एक कलात्मक आविष्कार आहे. ज्यामुळे माणूस स्वत:चे दु:ख बाजूला सारून या कलाविष्कारात समरस होत असतो.’’ मला बालपणापासूनच संगीतशास्त्र आणि मूर्ती बनविण्याचा छंद होता. या छंदामुळे मला आनंद मिळतोच, परंतु या आनंदाचा अंतर्भाव इतरांच्या जीवनात सहभागी व्हावा, म्हणून पाटस (ता. दौंड) सारख्या छोट्या गावातून कलावंतांना मोफत संगीतशास्त्रांचे धडे देत आहेत.हार्मोनियम, तबला आणि गायन या तिन्ही कला अवगत असल्याने या कला तरुणांना अवगत करण्यासाठी प्रेरित करीत असतो. छोट्या-मोठ्या मैफलीतून या नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामकाज करत आहे. एखाद्या कलावंताला घडविणे यासारखा दुसरा कुठला आनंद नाही.भारतीय संगीत समृद्ध असून या संगीताला पुरातन काळापासून राजाश्रय आहे. शास्त्रीय गायन किवा पाश्चात्त्य संगीत या शास्त्रात भाषेत फरक असेल, परंतु संगीतातील उद्दिष्ट एकच असते. आम्हाला आजोबांपासून संगीताचा वारसा आहे. बुवासाो पवार, पं. गवारे, पं. डॉ. विकास कशाळकर, मंजुषा पाटील यांच्याबरोबर माझे काका आणि गुरुजी पं. शरद करमळकर यांचे मार्गदर्शन मिळाले आणि मिळत आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये लय, सूर, संगीत असतेच फक्त आपल्याला ज्ञात व्हावे लागते. नवीन पिढीमध्ये एकदम मोठे नाव व्हावे असे वाटते. परंतु, संगीत शिकण्याकरिता गुरुंचे मार्गदर्शन, साधना आणि संगीताविषयी निष्ठा असणे आवश्यक आहे. संगीतकलेला मेहनत आणि सराव याशिवाय कुठलाही शॉर्टकट नाही. हे कलावंतांनी लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रीय गायन अवघड असते, असा चुकीचा समज समाजात आहे. परंत, त्याचे थोडे जरी ज्ञान झाले असले तर कलाकार शास्त्रीय संगीत सोडून गाणार नाही. याव्यतिरिक्त सुगम संगीत देखील सर्वश्रेष्ठ संगीत आहे. सुगम संगीतात बबनराव नावडीकर, गजानन वाटवे, सुधीर फडके, किशोरकुमार यांची गाणी आजही अजरामर आहेत. संगीतक्षेत्र मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. समृद्ध भारतीय संगीत नवीन पिढीमध्ये रुजविण्याचे काम ज्येष्ठ संगीतकारांनी निस्वार्थीपणे करावे. नवीन नवीन कलाकार समाजापुढे उभे करावेत, की जेणेकरून भारतीय संगीत अजरामर राहील.पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राग आणि आजार’ यांचे तीन दिवस शिबिर घेतले होते. या शिबिरात संगीत रागांचा रोगांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. यावरून आजार बरा करण्यासाठी कलात्मक संगीताची जोड ही महत्त्वाची ठरू शकते, असा माझा एकंदरीत अनुभव आहे. कारण कलात्मक क्षेत्राबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातदेखील कामकाज आहे. त्यानुसार निद्रानाश, मानसिक ताणतणाव या आजारांवर बागेश्री, दरबारी कानडा, यमन, मालकंस, अभोगी या रागांचा उपयोग होताना दिसून आला. उच्च रक्तदाब, मधुमेह या रोगांवर पुरिया-धनाश्री- तोडी या रागांचा उपयोग होतो. एकाग्रता वाढविण्यासाठी भीमपलास, तर अस्थमासारख्या आजारावर मियाँ मल्हार हा राग उपयुक्त पडतो.