शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

प्राध्यापक भरती आणि परदर्शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

विद्याशाखा कोणतेही असो किंवा विषय कोणताही असो, सर्व महाविद्यालयीन व्याख्यात्यांना १८ ते २३ या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखता आली ...

विद्याशाखा कोणतेही असो किंवा विषय कोणताही असो, सर्व महाविद्यालयीन व्याख्यात्यांना १८ ते २३ या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखता आली पाहिजे. म्हणून उच्च माध्यमिक पर्यंतच्या शिक्षकांना जशी बी.एड. सारखी पदवी आवश्यक आहे, तशीच एखादी पदवी महाविद्यालयीन व्याख्यात्यांना सुद्धा गरजेची वाटते. शिक्षणाचा इतिहास, अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य, तसेच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र ओळखण्याचे कौशल्य इत्यादी विषयांचा सदर पदवीमध्ये समावेश केला तर उपयुक्त ठरेल.

मुळातच सेट किंवा नेट, एम. फिल., पीएच.डी., यासारख्या उच्च शैक्षणिक पात्रता असताना पुन्हा वेगळ्या पदवीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु, नेट-सेट उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचणारे अध्यापन त्यांना करता येईलच असे नाही. कारण, प्रभावी अध्यापन हे कोणत्या पदवीवर अवलंबून नसते तर ते जाणीवपूर्वक आत्मसात केलेले कौशल्य असते. म्हणूनच उच्च शैक्षणिक पात्रता आत्मसात केलेल्या सर्वच व्याख्यात्यांना प्रभावी अध्यापन करता येईलच, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

प्रभावी अध्यापनात अभ्यास विषयाचे पुरेपूर ज्ञान व्याख्यात्यांना जितके आवश्यक असते, तेवढेच समोरच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य सुद्धा त्याच्याकडे हवे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मनोभाव नेमका समजणे फार महत्त्वाचे असते. तो समजल्यावरच व्याख्यात्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल.

तज्ज्ञांच्या समितीतर्फे विषय ज्ञान आणि त्या उमेदवाराचे शिक्षणाबाबतचे त्याचे स्वत:चे मत, इतर छंद, बाह्य वाचन याबाबी मुलाखतीद्वारे तपासता येतील. त्याची देहबोली, त्यातून प्रकट होणारी सकारात्मकता, आत्मविश्वास, नजरफेक याबाबी चर्चेच्या दरम्यान निरीक्षणातून पारखता येतील. थोड्याबहुत प्रमाणात या सर्व बाबी आजही अस्तित्वात आहेत.

प्रभावी अध्यापन हे एक कौशल्य असल्याने या कौशल्याची चाचणी यापुढे वर्गातच घेण्यात यावी. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या पत्रासोबतच त्याच्या विषयातील तीन विषय देण्यात यावेत. सदर उमेदवाराची चर्चा मुलाखत झाल्यावर त्याला या तीनपैकी एक टॉपिक साधारणपणे एक तास अगोदर देण्यात यावा. ज्या वर्गावर उमेदवाराची अध्यापन कौशल्य चाचणी होणार आहे तो वर्ग जाणीवपूर्वक सर्व साधारण, मध्यम आणि उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा असावा. त्याच्या त्या अध्यापन कौशल्य चाचणीचे पूर्ण चित्रीकरण करण्यात यावे. या सर्व गोष्टी सध्या प्रचलित असणाऱ्या कायद्याच्या चौकटीत राहून सहज करता येतील.अशा प्रकारच्या अध्यापन कौशल्य चाचणीला कोणतीही सूज्ञ व्यक्तीविरोध करणार नाही. यानंतर निवड समितीचा अहवाल हा सुस्पष्ट असावा. संबंधित उमेदवाराने मागणी केल्यास या संपूर्ण प्रक्रियेची चित्रफित त्याला सुपूर्द करण्यात यावी. वरील सर्व प्रकारामुळे सामाजिक न्यायाचे संपूर्ण भान ठेवूनही केवळ उच्च शिक्षणाचा दर्जा हा आबाधित राखला जाईल.

या प्रकारच्या निवडलेल्या प्रभावशाली व्याख्यात्यामध्ये आवश्यक आणि अत्यावश्यक कौशल्याबरोबरच गतिशील कौशल्य स्वीकारण्याची आत्मीयता नक्की राहील. असेच शिक्षक युवा-युवतींना योग्य न्याय देतील याविषयी दुमत नाही. - डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--------------------