शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरती आणि परदर्शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

विद्याशाखा कोणतेही असो किंवा विषय कोणताही असो, सर्व महाविद्यालयीन व्याख्यात्यांना १८ ते २३ या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखता आली ...

विद्याशाखा कोणतेही असो किंवा विषय कोणताही असो, सर्व महाविद्यालयीन व्याख्यात्यांना १८ ते २३ या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखता आली पाहिजे. म्हणून उच्च माध्यमिक पर्यंतच्या शिक्षकांना जशी बी.एड. सारखी पदवी आवश्यक आहे, तशीच एखादी पदवी महाविद्यालयीन व्याख्यात्यांना सुद्धा गरजेची वाटते. शिक्षणाचा इतिहास, अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य, तसेच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र ओळखण्याचे कौशल्य इत्यादी विषयांचा सदर पदवीमध्ये समावेश केला तर उपयुक्त ठरेल.

मुळातच सेट किंवा नेट, एम. फिल., पीएच.डी., यासारख्या उच्च शैक्षणिक पात्रता असताना पुन्हा वेगळ्या पदवीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु, नेट-सेट उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचणारे अध्यापन त्यांना करता येईलच असे नाही. कारण, प्रभावी अध्यापन हे कोणत्या पदवीवर अवलंबून नसते तर ते जाणीवपूर्वक आत्मसात केलेले कौशल्य असते. म्हणूनच उच्च शैक्षणिक पात्रता आत्मसात केलेल्या सर्वच व्याख्यात्यांना प्रभावी अध्यापन करता येईलच, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

प्रभावी अध्यापनात अभ्यास विषयाचे पुरेपूर ज्ञान व्याख्यात्यांना जितके आवश्यक असते, तेवढेच समोरच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य सुद्धा त्याच्याकडे हवे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मनोभाव नेमका समजणे फार महत्त्वाचे असते. तो समजल्यावरच व्याख्यात्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल.

तज्ज्ञांच्या समितीतर्फे विषय ज्ञान आणि त्या उमेदवाराचे शिक्षणाबाबतचे त्याचे स्वत:चे मत, इतर छंद, बाह्य वाचन याबाबी मुलाखतीद्वारे तपासता येतील. त्याची देहबोली, त्यातून प्रकट होणारी सकारात्मकता, आत्मविश्वास, नजरफेक याबाबी चर्चेच्या दरम्यान निरीक्षणातून पारखता येतील. थोड्याबहुत प्रमाणात या सर्व बाबी आजही अस्तित्वात आहेत.

प्रभावी अध्यापन हे एक कौशल्य असल्याने या कौशल्याची चाचणी यापुढे वर्गातच घेण्यात यावी. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या पत्रासोबतच त्याच्या विषयातील तीन विषय देण्यात यावेत. सदर उमेदवाराची चर्चा मुलाखत झाल्यावर त्याला या तीनपैकी एक टॉपिक साधारणपणे एक तास अगोदर देण्यात यावा. ज्या वर्गावर उमेदवाराची अध्यापन कौशल्य चाचणी होणार आहे तो वर्ग जाणीवपूर्वक सर्व साधारण, मध्यम आणि उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा असावा. त्याच्या त्या अध्यापन कौशल्य चाचणीचे पूर्ण चित्रीकरण करण्यात यावे. या सर्व गोष्टी सध्या प्रचलित असणाऱ्या कायद्याच्या चौकटीत राहून सहज करता येतील.अशा प्रकारच्या अध्यापन कौशल्य चाचणीला कोणतीही सूज्ञ व्यक्तीविरोध करणार नाही. यानंतर निवड समितीचा अहवाल हा सुस्पष्ट असावा. संबंधित उमेदवाराने मागणी केल्यास या संपूर्ण प्रक्रियेची चित्रफित त्याला सुपूर्द करण्यात यावी. वरील सर्व प्रकारामुळे सामाजिक न्यायाचे संपूर्ण भान ठेवूनही केवळ उच्च शिक्षणाचा दर्जा हा आबाधित राखला जाईल.

या प्रकारच्या निवडलेल्या प्रभावशाली व्याख्यात्यामध्ये आवश्यक आणि अत्यावश्यक कौशल्याबरोबरच गतिशील कौशल्य स्वीकारण्याची आत्मीयता नक्की राहील. असेच शिक्षक युवा-युवतींना योग्य न्याय देतील याविषयी दुमत नाही. - डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--------------------