शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

भगवान महावीरांच्या प्रतिमेची इंदापुरात मिरवणूक

By admin | Updated: April 10, 2017 02:01 IST

भगवान महावीर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली

इंदापूर : भगवान महावीर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी सर्व संप्रदाय एकत्र झाले होते. महिलांचा लक्षवेधी सहभाग होता.जैन धर्मीयांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त जैन संप्रदायांनी एकत्रितरीत्या भगवान महावीरांचा जयघोष करत त्यांच्या प्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक काढली. मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष भरत शहा, बाबा चौकात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील तळेकर, प्रमोद राऊत, दत्ता राऊत यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. भगवान महावीरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर तीर्थक्षेत्रपासून सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीची सांगता तीन तासांनंतर पुरातन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात करण्यात आली. शांतिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा हुमड जैन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे विश्वस्त जीवंधर दोशी, श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मूर्तिपूजक मंदिर ट्रस्टचे नरेंद्र गांधी, पारसमल बागरेचा, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, जैन डॉक्टर संघटनेचे डॉ. सागर दोशी, डॉ. ए. के. मेहता, डॉ. आशिष दोभाडा, वर्धमान स्थानकवासी जैन संप्रदायाचे जवाहर बोरा, संजय बोरा, सुनील बोरा यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला.भगवंत प्रतिमेस पालखीत विराजमान करण्याचा व पालखी उचलण्याचा मान अरुण दोशी व संजय दोशी यांना मिळाला. भगवान महावीर पथ, जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बालाजी पथ, शिवाजी पथ, मुख्य बाजारपेठ, नेहरू चौक, संभाजी चौकातून मिरवणुकीचा समारोप श्री पार्श्वनाथ मंदिरामध्ये झाला. मिरवणुकीत नीलेश मोडासे, नितीन शहा, मोहन दोशी, संदीप दोशी, श्रेणिक कासार, महावीर शहा, भारत दोभाडा, अरविंद गांधी, प्रतीक गांधी, उत्कर्ष दोशी, महेंद्र गुंदेचा, पिंटू मेहता, पीयूष बोरा, सुभाष गांधी, नंदकुमार मेहता, प्रकाश बलदोटा आदी सहभागी झाले होते. रौनक बोरा, अभिषेक दोशी, मनोज शहा यांनी पाणी व साखर वाटप केले. मिरवणुकीत माजी नगरसेवक मिलिंद दोशी यांनी भगवंताचा जयघोष केला. मंदिरात शेखर दोशी व संदीप शहा यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेवर विधिवत अभिषेक करण्यात आला. सचिन पंडित व शांतिनाथ उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.