शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गैरसोयीचा कालावधी वाढल्यास अडचणीचे

By admin | Updated: November 13, 2016 04:28 IST

बनावट नोटा; तसेच काळ्या पैशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेण्यात आलेला विमुद्रीकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे १० टक्के काळा पैसा बाहेर आला, तरी मोठे यश

पुणे : बनावट नोटा; तसेच काळ्या पैशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेण्यात आलेला विमुद्रीकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे १० टक्के काळा पैसा बाहेर आला, तरी मोठे यश म्हणावे लागेल. सध्या नवीन नोटांचा पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे; मात्र ही गैरसोय जास्त दिवस होत राहिल्यास अडचणीचे ठरू शकते, असे मत रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.गोखले इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्समध्ये आयोजित ‘अर्थशास्त्र महोत्सवात’ त्या बोलत होत्या. ‘आर्थिक धोरण, आर्थिक धोरण समिती आणि केंद्रीय बँकांचे स्वातंत्र्य’ या विषयावर थोरात यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, बनावट नोटांचे वाढते प्रमाण कमी करणे, काळा पैसा चलनात आणणे ही दोन प्रमुख्य उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सोने, जमीन, घर अशा स्थावर मालमत्तेतही काळा पैसा गुंतविण्यात आला आहे. मात्र, हा वेगळा मुद्दा आहे. देशात सुमारे १५ लाख कोटी काळा पैसा असण्याची शक्यता आहे. यापैकी किमान १० टक्के म्हणजे, दीड लाख कोटी पैसा उघड झाला तरी हे खूप मोठे यश असेल. असेही थोरात यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैसा असलेल्यांकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांकडून बँकेत पैसे जमा केल्यानंतर, त्याची लगेच चौकशी होणार आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईचा खर्च एक हजाराच्या नोटेपेक्षा कमी आहे. तसेच, जास्तीत जास्त लोक ५०० रुपयांच्या नोटांचा चलनात अधिक वापर करतात. त्यामुळे दोन हजार रुपयांचा वापर कमी होणार आहे. हा विचार करून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असावी. नवीन नोटेमुळे बनावट नोटा बनविण्याला मोठा आळा बसेल, असे थोरात यांनी सांगितले.