शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एसआरपी भरतीबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST

पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे

बारामती : पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी व आयआरबीची भरती प्रक्रिया स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात ५ युवकांना प्राण गमवावे लागले होते. यावर एका स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केले. पुरुष उमेदवारासाठी असणारी ५ किमी धावण्याची मर्यादा १६०० मीटर करण्यात आली, तर महिला उमेदवारांसाठी हे अंतर ३ किमीवरून ८०० मीटरवर आणले. मात्र, महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी भरती प्रक्रियेबाबतचे नियम ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, परिपत्रक आणि भरती विभागाच्या संकेतस्थळावरही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे एसआरपी आणि आयआरबीच्या उमेदवारांना मागील नियमानुसारच भरतीसाठी उतरावे लागणार का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासनाने एसआरपीची भरती प्रक्रिया स्पष्ट करावी. परिणामी, उमेदवारांमधील संभ्रम दूर होण्यात मदत होईल, असे येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकॅडमीचे उमेश रूपनवर यांनी सांगितले.