शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

एसआरपी भरतीबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST

पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे

बारामती : पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी व आयआरबीची भरती प्रक्रिया स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात ५ युवकांना प्राण गमवावे लागले होते. यावर एका स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केले. पुरुष उमेदवारासाठी असणारी ५ किमी धावण्याची मर्यादा १६०० मीटर करण्यात आली, तर महिला उमेदवारांसाठी हे अंतर ३ किमीवरून ८०० मीटरवर आणले. मात्र, महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी भरती प्रक्रियेबाबतचे नियम ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, परिपत्रक आणि भरती विभागाच्या संकेतस्थळावरही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे एसआरपी आणि आयआरबीच्या उमेदवारांना मागील नियमानुसारच भरतीसाठी उतरावे लागणार का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासनाने एसआरपीची भरती प्रक्रिया स्पष्ट करावी. परिणामी, उमेदवारांमधील संभ्रम दूर होण्यात मदत होईल, असे येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकॅडमीचे उमेश रूपनवर यांनी सांगितले.