शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

वेल्ह्यातही पुनर्वसनात अडचणी

By admin | Updated: December 19, 2014 02:03 IST

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार आ

मार्गासनी : गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार आहे त्या जागेचा मालकाने (गुजर कुटुंबीयांनी) कोर्टात दावा दाखल केला असून, त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश घेतला आहे.जिल्हा प्रशासनाने गुंजवणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. धरण पूर्ण क्षमतेचे झाल्यास धरणाच्या फुगवट्यात जाणाऱ्या घराचे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यातील ८५ प्रकल्पग्रस्तांना धरणाच्या खालील बाजूस घरासाठी प्लॉट व तेथूनच पुढे आठ किलोमीटर अंतराच्या आत शेतीसाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या जागेवर सरकार हे पुनर्वसन करू पाहत आहे, तो मालकच न्यायालयात गेला आहे.याबाबत मालक हेमंत गुजर यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली असता, आमची जमीन गेल्यावर आमचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. धरणाखालची जमीन अद्याप आम्ही कसत आहोत. त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे. आमची जमीन धरणासाठी घेतल्यावर त्यावर बुडीत क्षेत्रात जाणारी जमीन असा उल्लेख आहे. मात्र, पुनर्वसनाच्या नियमानुसार बुडीत क्षेत्रातील जमीन पुनर्वसनासाठी वापरात येऊ शकत नाही. असे असताना या ठिकाणी गावठाण कसे वसवले जाऊ शकते? शिवाय ज्या ८५ खातेदारांना येथे प्लॉट दिले जाणार आहेत त्यांना शिरूर व दौंड तालुक्यात जमिनी, घरे दिली गेली आहेत. त्या ठिकाणी नवे गाव वसवण्यात आले आहे. शासनाने एवढा केलेला खर्च तसाच सोडून या ठिकाणीच पुनर्वसनाचा हट्ट का, असा त्यांनी केला. (वार्ताहर)