शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्योत्तर कालखंडात समस्याच

By admin | Updated: November 25, 2014 00:32 IST

प्रतीक्षा : पायाभूत सुविधा व रोजगार निर्मितीसाठी नियोजित प्रयत्नांची गरज

प्रशांत सुर्वे - मंडणगड -डोंगराळ नैसर्गिक संरचनेमुळे विकासाच्या वाटवेर साठ वर्र्षांनतरही मागे राहीलेल्या मंडणगड तालुक्याच्या विकासाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी पायाभुत सुविधांच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मीतीसाठी नियोजीत प्रयत्नांची गरज नेहमीच अधोरेखीत झाली आहे़ घटनकार भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव (आंबडवे) असलेला हा तालुका स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वार्थाने अविकसीत राहीलेला आहे.राजकीय व्यासपाठीवरुन या तालुक्यातून मतदार संघाचे नेतृत्व करेल असे नेतृत्व अपवादानेच निर्माण झाल्याने तालुक्यास कधीही झुकते माप मिळालेले नाही़ तालुक्याचा वापर केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मतांच्या गोळा बेरजेकरिता केला गेल्याने येथे वेगवेगळाा अर्थिक क्रियांच्या माध्यमातून रोजगार निर्मीतीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न झाल्याने आजही येथील तरुण रोजगारासाठी मुंबई व पुण्यासारख्या महानगरांवर विसंबून राहीला आहे़ या तालुक्यातील कर्त्या लोकसंख्येचे रोजगारासाठी स्थलांतर झाल्याने लोकसंख्येत सातत्याने घट होत आहे़ अनैर्सगीक कारणांनी लागलेली गळती थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही़ राजकीय व्यासपीठांवर तर विकासाच्या चर्चेची केवळ गुर्हाळे मांडली जात आहेत़ आजही तालुक्यात चालेलेल्या अर्थिक घडमोडीचां पाया पर्यावरणाला हानी पोहचवील अशा उद्योगांवर अवलंबुन आहे. गोव्यासारखे पर्यावरण देत निर्सगाने या तालुक्यास भरभरुन निसर्ग सौंदर्य दिले आहे, माा राज्यकर्त्यांना कपाळ करंटेपणा दाखवत पर्यावरण अधोगतीचीच पाठराखण केली आहे़ नाही म्हणायला तालुक्यात रोजगार निर्मीती व्हावी यासाठी युती शासनाचे काळात तालुक्यातील पहील्यावहील्या लघु उद्योग सहकारी संस्थेस ( मिनी एम़आय़ डी़सी़) षासनाने मान्यता दिली़ माा षेतक=यांच्या प्रष्नांसह विविध कारणांनी ही वसाहत गेल्या अठरा वर्षात वास्तवात उतरु शकली नाही़ त्यामुळे त्या माध्यमातून रोजगार निर्मीतीची येथील जनतेची अपेक्षा फोल ठरली आहे़ विरोधाला विरोध व श्रेयवादात तालुक्याचा प्रत्येक प्रश्न अडकल्याचे दुर्दैवी चित्र असल्याने नागरीकांच्या जीवीताशी संबंधीत आरोग्याच्या प्रश्नावरही राज्यकर्त्यांना क्रुर चेष्टा मांडल्याने सर्वसोर्इंनी युक्त असे रुग्णालय उभारूनही ते अद्याप जनतेच्या सेवेसाठी सुरु होऊ षकेलले नाही़ षेतक=यांचे प्रष्न सोडवण्यासाठी षासनाने चिंचाळी, तुळषी, पंदेरी, भोळवली, तिडे या ठिकाणी धरणे सुरु केली पण हे प्रकल्पही स्थापनेपासून तीस वषार्नंतरही अपूर्ण आहेत विविध कारणांनी प्रकल्प रखडल्याने धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊच शकला नाही, वास्तवात या पाच धरणातून तालुक्यातील किमीन दोन हजार एकर क्षो सिंचनाखाली येणे आपेक्षीत होते़ अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजांबरोबर षिक्षण व आरोग्य या आधुनीक काळातील मानवाच्या जीवनावष्यक गरजा बनल्या आहेत त्या बाबतीत तालुक्यात म्हणावी अषी प्रगती झालेली नाही आज प्राथमीक ते पदवी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले आहे हे खरे असले तरी रोजगाराभिमुख उच्च षिक्षणक्रमांची सोय येथे उपलब्ध करण्याची गरज आहे़ पर्यटन उद्योगाच्या विकासाची गेली काही वर्शे तालुक्यातील केवळ चर्चा आहे येथील ऐैतिहासीक, सामाजीक व सास्कृतीक पर्यटनस्थळांच्या बलस्थानांबरोबरच कोकणी व येथील लोकजीवनाचे सादरीकरण केल्यास पर्यटन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहेत मात्र कोणतीही कृती होताना दिसून येत नाही़ तालुक्यास लाभलेला सावित्री नदी किनारा व अरबी समुद्र यांचा पर्यटनासाठी वापर करता येईल का याचेही चिंतन सुरु आहे़ लोकप्रतिनिधीकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने चर्चेच्या पलीकडे विकासाची गाडी सरकलेली नाही. मंडणगडसारख्या तालुक्यात विकासाची गती वाढावी यासाठी प्रयत्न केले जावेत असे प्रयत्न अद्याप करण्यात येत नाहीत ही शोकांतिका आहे. पूर्वी या तालुक्यात विकासापासून कोसो दूर असल्याची स्थिती होती. आता परिस्थिती बदलत असली तरीही फार चांगली स्थिती नसल्याने हा संपूर्ण तालुका विकासाच्या प्रतिक्षेत आहे.1तालुक्यातील किल्ले हिंमतगड, किल्ले मंडणगड, आंबडवे, वेळास, पंदेरी लेणी या ठिकाणी पर्यटन उद्योगांच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती करणे़2तालुक्यातील धरण प्रकल्पातील फुकट जात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना करुन देताना रखडलेले धरण प्रकल्प मार्गी लावावेत. पाण्याचा कृषी व अन्य कारणांसाठी वापर होण्याकरिता कालव्यांची निर्मिती करणे गरजेचे़3तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावावा़ 4बिकट अवस्थेत असलेल्या तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज. 5तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय, न्यायालय व क्रीडा संकुलाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावावा़ 6मंडणगड शहराची पंचवीस वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी़ 7शहरातील वाहूतक कोंडी, कचरा व सांडपाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आवश्यक. 8तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांमधून निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी नियोजन व उपायांची गरज़ 9अंगणवाड्या, ग्रामपंचायती, तलाठी, मंडल कार्यालये व आरोग्य उपकेंद्रांसाठी हक्काच्या इमारती उपलब्ध करुन देण्यात याव्यात़10महावितरणचे सडलेले व गंजलेले खांब बदलण्यात यावेत. एस़ टी़ महामंडळाचा कारभार अधिकाधिक प्रवासाभिमुख व्हावा. 11उच्च तंत्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात.