शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

हिंदुत्ववादी विचार मानवतेच्या कक्षेत बसणारा नाही : डॉ. रावसाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

पुणे : सध्याच्या काळात हिंदुत्त्ववादी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. मात्र हा विचार संकुचित असून, तो जगातील मानवतेच्या कक्षेत ...

पुणे : सध्याच्या काळात हिंदुत्त्ववादी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. मात्र हा विचार संकुचित असून, तो जगातील मानवतेच्या कक्षेत बसत नाही. यासाठी पुरोगामी विचार घेऊनच पुढे गेले पाहिजे. त्यातूनच परिवर्तनवादी आणि सुधारणावादी महाराष्ट्र निर्माण होईल असे मत अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील यांनी मंगळवारी (दि. १५) व्यक्त केले.

सोलापूरात येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या पंचविसाव्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, कलागौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड अभय छाजेड, ‘संवाद’चे सुनील महाजन, डॉ शैलेश गुजर आणि जैन सहयोग पुणेचे मिलिंद फडे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि जैन धर्म यांचा निकटचा संबंध असून, त्याला ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे. जैन साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचे ज्ञान अवगत होणार नाही असे डॉ. पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, महावीरांनी अहिंसेमध्ये न्याय दडलेला आहे याचीच एकप्रकारे शिकवण दिली. नंतर तोच विचार महात्मा फुले यांनी समतेच्या माध्यमातून मांडला.

प्रा मिलिंद जोशी म्हणाले, जैन धर्माने आचार व विचारांना महत्व दिले आहे. पण आज यात दरी निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक हिंसाचार वाढत आहे. त्यामुळे समाज मन दुभंगत आहे ते कसं सावरायचं हे मोठे आव्हान आहे. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

--------------------------------------------