शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत खासगी भागीदार, कंपन्यांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

प्रकल्पग्रस्त मालकाची फसवणूक थांबणार : भूखंड हस्तांतरणाची मर्यादा दोन वर्षांऐवजी पाच वर्षे होणार अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ...

प्रकल्पग्रस्त मालकाची फसवणूक थांबणार : भूखंड हस्तांतरणाची मर्यादा दोन वर्षांऐवजी पाच वर्षे होणार

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रकल्पग्रस्तास उद्योग उभारण्यासाठी खासगी भागभांडवल उभारण्याची तरतूद केली आहे. वाटप केलेल्या भूखंडावरील उद्योगांमध्ये ४९ टक्के भागभांडवल अथवा हिस्सा बाहेरील व्यक्तीच्या नावे ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, हे खासगी भागीदार विहित कालावधीनंतर संपूर्ण प्रकल्पच शेतकऱ्यांची फसवणूक करून स्वतःच्या नावे करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच एमआयडीसीतील भूखंड हस्तांतरणाची मर्यादा दोनऐवजी आता पाच वर्षे करण्याचा निर्णय महामंडळ संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्त मालकाची फसवणूक थांबणार असून, भागीदार अथवा कंपन्यांना चाप बसणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त सदराखालील वाटप केलेल्या भूखंडाचे खासगी भागभांडवल तसेच हस्तांतरणास १९९४, २००६, २००९ आणि २०१९ च्या धोरणानुसार परवानगी दिलेली आहे. म्हणजे प्रकल्पग्रस्तांना स्वतः उद्योग उभारून विकसित करण्यासाठीची परवानगी आहे. त्यात आता महामंडळाने सुधारणा केल्या आहेत.

शासनाच्या धोरणानुसार वाटप केलेल्या भूखंडावर स्थापन केलेल्या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीला ४९ टक्के हिस्सा धारण करण्याचा निर्णय होता. तो आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार वाटप होणार आहे. तसेच, प्रकल्पग्रस्त ही कंपनी चालवू शकत नसल्यास त्या कंपनीच्या इमारत किंवा संपूर्ण बांधकाम बाहेरील व्यक्तीस सवलतीच्या दराने पोटभाड्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

-----

कोट

राज्य शासनाने घेतलेला निर्णय शेतकरीहिताचा आहे. मागील काही वर्षांत चाकण-तळेगाव एमआयडीसीत आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यात आमच्या काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या निर्णयामुळे यापुढे कंपनीत किमान पाच वर्षे, तरी शेतकरी भागीदार राहील.

- रघुनाथ येळवंडे, प्रकल्पबाधित शेतकरी

----

कोट

शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवणारा आहे. बहुतांश शेतकरी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असल्याने नुकसान होत होते. यापुढे फसवणूक झाल्यास कायदेशीरदृष्टीने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी लढता येईल.

- रामभाऊ काचोळे, प्रकल्पबाधित शेतकरी