शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

पंतप्रधानांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 15, 2016 02:48 IST

मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

पुणे : मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली़ राष्ट्रीय मजदूर संघाच्या कामगार मेळाव्याप्रसंगी रविवारी काँग्रेस भवनात नवनिर्वाचित विधान परिषद आमदार व कामगारनेते भाई जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते़ याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे उपस्थित होते.हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘भाई जगताप हे घरेलू कामगारांचे, साखर कारखान्यांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यास आग्रही असतात व हेच नेमके विरोधकांना रुचणारे नव्हते. त्यामुळे विरोधकांचा भाई जगताप यांना पाडण्याचा उद्देश होता़’’ भाई जगताप म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात कामगार संघटनांच्या प्रश्नाकडे थोडे दुर्लक्ष झाले़ विरोधकांनी डाळींचा भाव फक्त फोटो काढून घेण्यासाठी १०० रुपये केला. त्यानंतर मात्र डाळीचा भाव जैसे थे असल्याचे सांगितले.याप्रसंगी विश्वजित कदमांनी पुन्हा एकदा मित्रपक्षावरचा नाराजीचा सूर आळवला व त्याला हर्षवर्धन पाटलांबरोबरच भाई जगतापांनीसुद्धा प्रतिसाद दिला. सहज-सोपी असणारी विधान परिषदेची निवडणूक मित्रपक्षाच्या दुटप्पी वागण्यामुळेच प्रतिष्ठेची झाली होती, असे भाई जगताप यांनी नमूद केले.