शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

By admin | Updated: February 27, 2015 06:02 IST

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचा २०१५-१६ या वर्षीचा १४० कोटी ८१ लाख रुपयांचा अंतिम अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शालेय खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य मिळत नसल्यामुळे शिक्षण मंडळ ठेकेदारच चालवीत असल्याची टीका नगरसेवकांनी केली.शिक्षण मंडळाचा २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाचा ११३ कोटी ७८ लाखांचा सुधारित अर्थसंकल्प आणि आगामी २०१५-१६ चा ११० कोटी ९६ लाखांचा मूळ अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांनी गेल्या महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केला होता. शिक्षण मंडळ प्रशासनाने मूळ अर्थसंकल्पात १२३ कोटी ९९ लाखांची तरतूद सुचविली होती. त्यामध्ये शिक्षण मंडळ सदस्यांनी ५ कोटी ८ लाखांची वाढ करीत १२९ कोटी ७ लाख रुपयांच्या खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे आयुक्त राजीव जाधव यांनी त्यात १८ कोटी १८ लाखांची कपात सुचविली. तसेच केवळ ११० कोटी ९६ लाख ५० हजार खर्चाचा अर्थसंकल्प गेल्या महिन्यात पुन्हा स्थायी समितीपुढे सादर केला होता. त्यानंतर शिक्षण मंडळ सदस्यांनी आग्रह धरल्याने १९ कोटी ८५ लाख रुपयांच्या उपसूचना स्थायी समितीने मंजूर केल्या. स्थायी समितीने शाळा फर्निचर, शाळा दुरुस्ती व देखभाल, कचरापेट्या, साहित्यखरेदी, शारीरिक शिक्षण साहित्य खरेदी, पीटी गणवेश, पाट्या, दफ्तरे, स्वेटर वीजरोधक यंत्रणा, सायन्स पार्क भेट आदींवरील खर्चकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनंतर १३० कोटी ८१ लाख २२ हजार खर्चाचा अर्थसंकल्प महापालिका सभेपुढे सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर गुरुवारी झालेल्या सभेत चर्चा झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या माध्यमातून सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. शिक्षणाच्या ढासळत असलेल्या दर्जाला शिक्षकवर्ग व पालिका प्रशासन जबाबदार आहे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. स्थायीने मंजूर केलेल्या १३० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात १० कोटींची वाढ करून एकूण १४० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अंतिम अर्थसंकल्पाला महापालिका सभेने मंजुरी दिली. या चर्चेत मंगला कदम, शांताराम भालेकर, सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर, सुलभा उबाळे, बाबा धुमाळ, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, उल्हास शेट्टी, अरुण बोऱ्हाडे, अनिता तापकीर, राजेंद्र काटे, शमीम पठाण, संजय काटे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)