शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

By admin | Updated: February 27, 2015 06:02 IST

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचा २०१५-१६ या वर्षीचा १४० कोटी ८१ लाख रुपयांचा अंतिम अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शालेय खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य मिळत नसल्यामुळे शिक्षण मंडळ ठेकेदारच चालवीत असल्याची टीका नगरसेवकांनी केली.शिक्षण मंडळाचा २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाचा ११३ कोटी ७८ लाखांचा सुधारित अर्थसंकल्प आणि आगामी २०१५-१६ चा ११० कोटी ९६ लाखांचा मूळ अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांनी गेल्या महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केला होता. शिक्षण मंडळ प्रशासनाने मूळ अर्थसंकल्पात १२३ कोटी ९९ लाखांची तरतूद सुचविली होती. त्यामध्ये शिक्षण मंडळ सदस्यांनी ५ कोटी ८ लाखांची वाढ करीत १२९ कोटी ७ लाख रुपयांच्या खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे आयुक्त राजीव जाधव यांनी त्यात १८ कोटी १८ लाखांची कपात सुचविली. तसेच केवळ ११० कोटी ९६ लाख ५० हजार खर्चाचा अर्थसंकल्प गेल्या महिन्यात पुन्हा स्थायी समितीपुढे सादर केला होता. त्यानंतर शिक्षण मंडळ सदस्यांनी आग्रह धरल्याने १९ कोटी ८५ लाख रुपयांच्या उपसूचना स्थायी समितीने मंजूर केल्या. स्थायी समितीने शाळा फर्निचर, शाळा दुरुस्ती व देखभाल, कचरापेट्या, साहित्यखरेदी, शारीरिक शिक्षण साहित्य खरेदी, पीटी गणवेश, पाट्या, दफ्तरे, स्वेटर वीजरोधक यंत्रणा, सायन्स पार्क भेट आदींवरील खर्चकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनंतर १३० कोटी ८१ लाख २२ हजार खर्चाचा अर्थसंकल्प महापालिका सभेपुढे सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर गुरुवारी झालेल्या सभेत चर्चा झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या माध्यमातून सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. शिक्षणाच्या ढासळत असलेल्या दर्जाला शिक्षकवर्ग व पालिका प्रशासन जबाबदार आहे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. स्थायीने मंजूर केलेल्या १३० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात १० कोटींची वाढ करून एकूण १४० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अंतिम अर्थसंकल्पाला महापालिका सभेने मंजुरी दिली. या चर्चेत मंगला कदम, शांताराम भालेकर, सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर, सुलभा उबाळे, बाबा धुमाळ, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, उल्हास शेट्टी, अरुण बोऱ्हाडे, अनिता तापकीर, राजेंद्र काटे, शमीम पठाण, संजय काटे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)