शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

भरीव निधीसाठी केंद्रावर दबाव

By admin | Updated: January 21, 2016 01:16 IST

गेल्या दोन-तीन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे हे दुर्दैव आहे. यासाठी राज्याच्या वाट्याला केंद्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत

पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे हे दुर्दैव आहे. यासाठी राज्याच्या वाट्याला केंद्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी राज्यातील खासदारांना एकत्र करून एक दबावगट करू, असे आश्वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. पुणे जिल्हा परिषदेत बुधवारी सर्व शिक्षा अभियानाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैैठक आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. ही पहिलीच आढावा बैैठक झाली असून, यात जिल्हा परिषद, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अभियानांतर्गत कामांचा आढावा सांगितला. यातून केंद्राकडून या वर्षी कमी निधी मिळाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी गेल्या वर्षभरापासून वर्गखोल्यांची मागणी होत आहे. १ हजार २00 वर्गखोल्यांची आवश्यकता असताना फक्त ३ वर्गखोल्या जिल्ह्याला मिळाल्या आहेत. कारण राज्यालाच कमी निधी मिळाल्याचे या वेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, की एकूण परिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, केंद्राकडून मिळालेला निधी कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारीत १0 ते १२ तारखेला अधिवेशन आहे. तसेच फेबु्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बजेट असेल. माझ्या नेतृत्वाखाली राज्यातील खासदारांचा एक दबावगट तयार करीत आहोत. हा दबावगट केंद्राच्या शिक्षणमंत्र्यांबरोबर बैैठक करून पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव निधी मिळेल याची काळजी घेणार असल्याचे सांगितले.या बैैठकीला आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)