शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा

By admin | Updated: February 8, 2015 00:06 IST

गरिबी, निरक्षरता आणि विषमता यांचे उच्चाटन झाल्यावरच देशात खऱ्या अर्थाने स्वराज्य येईल, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते.

पुणे : गरिबी, निरक्षरता आणि विषमता यांचे उच्चाटन झाल्यावरच देशात खऱ्या अर्थाने स्वराज्य येईल, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. गांधीजींना अभिप्रेत असलेले स्वराज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी आज पुण्यात केले.सूर्यदत्ता एज्युकेशनल फाउंडेशनच्या १७व्या वर्धापन दिनी १२व्या सूर्यदत्ता जीवनगौरव आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण कोहली यांच्या हस्ते झाले. दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना मरणोत्तर ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.आचार्य डॉ. लोकेश मुनी, शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, उद्योजक शिव नडार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, १९७५मध्ये देशाला हॉकीचा विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अशोकुमार, किरण चोपडा यांनाही ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. श्रावणकुमार, वेदप्रकाश, डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. स्वाती लोढा, फत्तेचंद रांका, सुभाष रुणवाल, लक्ष्मी त्रिपाठी, अमर ओक यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी आॅल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे प्रमुख मनिंदरजितसिंग बिट्टा, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक-संचालक प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालिका सुषमा चोरडिया, अभिनेते शैलेश लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कोहली म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली आहेत, तरीही महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेले स्वराज अद्याप येऊ शकलेले नाही. सध्या विकसनशील देश असलेल्या भारताला ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विकसित देश बनवण्याचे ध्येय आहे.‘‘आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. त्याच्या विकासासाठी आवश्यक प्रोत्साहन आणि वातावरण आपण उपलब्ध करून द्यायला हवे. ’’शिक्षणक्षेत्रात सूर्यदत्ता ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. शिवाय आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करून समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याचे मोलाचे कामदेखील ही संस्था करीत आहे, असेही कोहली यांनी आवर्जून नमूद केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान केल्याने ‘सूर्यदत्ता’ला स्वत:ला सन्मानित झाल्यासारखे वाटत असल्याची भावना प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली. किशन शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)४आर. के. लक्ष्मण यांना देण्यात आलेला मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी स्वीकारला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात लक्ष्मण यांना मानवंदना दिली. कमला लक्ष्मण म्हणाल्या, ‘‘समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी आर. के. यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांचा कॉमन मॅन सर्वांनाच आपलासा वाटला. हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटतो. ते असते, तर आनंद द्विगुणित झाला असता.’’