शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण

By admin | Updated: February 2, 2015 23:15 IST

जेजुरीत उद्यापासून सुरू होत असलेल्या माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली असून, प्रशासनाने यात्राकाळातील बंदोबस्त सज्ज ठेवलेला आहे.

जेजुरी : जेजुरीत उद्यापासून सुरू होत असलेल्या माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली असून, प्रशासनाने यात्राकाळातील बंदोबस्त सज्ज ठेवलेला आहे. माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरीत उद्यापासून दोन दिवस शिखरी यात्रा भरणार आहे. संगमनेर येथील होळम, सुपे येथील खैरे, त्याचबरोबर स्थानिक होळकर शिखरी काठ्या देवभेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. याच काठ्यांच्याबरोबर देवभेट घेणाऱ्यास इतरही ५० शिखरी काठ्या जेजुरीत आल्या आहेत. दर चार वर्र्षांनी कोकणातून येथे येणारे कोळी बांधव आपआपल्या उत्सवमूर्तींच्या पालख्या घेऊन जेजुरीत आले आहेत. या वर्षी मुरुड जंजिरा, अलिबाग, धारावी, बोडणी, वेसावा, रेवस, मांडवी, मुंबई, आदी भागातील कोळी बांधव यात्रेसाठी येथील ऐतिहासिक चिंचबागेत आले आहेत. चिंचबाग अपुरी पडू लागल्याने बागेनजिकच्या परिसरात या शिखरी काठ्या व कोळी बांधव उतरले आहेत. तंबू टाकून भाविक उतरले असून, कोळी बांधवांच्या गोटात रोज रात्री कोळीगीते, कोळीनृत्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. उद्या मंगळवारी कोळी बांधव आपापल्या उत्सवमूर्तींच्या पालख्यांसह देवदर्शन उरकतील. बुधवारी शिखरी काठ्या देवभेट उरकणार आहेत.प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, स.पो.नि. रामदास शेळके, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी कडेपठार रस्ता, चिंचबाग, शिखरी काठ्या गडावर जाण्याचा मार्ग आदी परिसराची पाहणी केली असून, गडावर जाणारा कच्चा रस्ता बंद करण्यात आला आहे. गडाच्या पायऱ्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असून, मुख्य पायरी मार्ग एकेरी रहदारीसाठी ठेवण्यात आला आहे. यात्रेसाठी मोठा पोलीस फौजफाटा जेजुरीत दाखल झाला आहे. (वार्ताहर)वीर येथे आज देवाचा लग्नसोहळा खळद /वीर : श्रीक्षेत्र वीर (पुरंदर) येथे सवाईसर्जाचं चांगभलं व माता जोगेश्वरीच्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. या वेळी देवाला हळद लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. वाहनांना प्रवेश नाहीयात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी व बुधवारी वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला असून, पालखीतळ, बाजारतळ, जुनी जेजुरी, कडेपठार कमान या परिसरात भाविकांनी वाहने पार्किंग करावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.