शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

महापालिका निवडणुकीची तयारी

By admin | Updated: March 21, 2016 00:57 IST

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरी प्रश्नांवर पक्षाने जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचना या वेळी नेत्यांनी केली.लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षामध्ये मरगळ आलेली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे व विभागीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीबरोबरच पाडव्याला होणारा पक्षाचा मेळावा याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या महापालिकेच्या सभागृहात मनसेचे २८ नगरसेवक आहेत. निवडणुकीनंतर मनसे हा सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, गेल्या ४ वर्षांत समीकरण वेगाने बदलत आहेत. देशात आलेल्या मोदी लाटेमुळे केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आहे. या सत्तांतराचे तडाखे स्थानिक पातळीवरही बसण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही परप्रांतीयांविरुद्ध पुन्हा एकदा ‘रिक्षा जाळो’ आंदोलनाची घोषणा करून मनसेचा जुना अजेंडा अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचे इरादे जाहीर केले आहेत. रिक्षा जाळो आंदोलनानंतर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी तातडीने काही काळापर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाडव्याला ८ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मनसेकडून यापुढील काळात पाडवा मेळाव्याद्वारे उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ‘४ सदस्यांचा एक प्रभाग’ अशा पद्धतीने घेण्याची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रभाग पद्धतीने लढलो तर जास्त फायदा होईल, असे समीकरण मांडून त्या दृष्टीने पावले उचलण्यास भाजपच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. सरकारचाच एक भाग असलेल्या शिवसेनेने मात्र या प्रभाग पद्धतीला आपला तीव्र विरोध जाहीर केला आहे. प्रभाग पध्दतीने निवडणुका झाल्यास मनसेला खुप ताकद लावावी लागणार आहे.