शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

उड्डाणपुलांच्या बांधणीला प्राधान्य

By admin | Updated: March 17, 2017 02:31 IST

शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा

पुणे : शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नवनिर्वाचित सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर पिंपरी-सांडस येथील कचरा प्रकल्पाची जागा हस्तांतरण, जायका प्रकल्पाची अंमलबजावणी आदी प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भिमाले यांनी दिली.महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांची सभागृह नेतेपदी निवड केल्याचे पत्र त्यांना दिले. या वेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरली मोहोळ उपस्थित होते. त्यानंतर भिमाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भिमाले यांनी सांगितले, ‘‘शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुरू असलेल्या उड्डाणपुलांचे काम लवकर मार्गी लावले जाईल. त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी आणखी उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. उड्डाणपुलांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविला जाणार आहे.’’पिंपरी-सांडस येथील जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव गेल्या ४ महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला कधी मंजुरी मिळणार, याची भिमाले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘पिंपरी-सांडसच्या जागेबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, लवकरच त्याला शासनाची मंजुरी मिळेल.’’जायका प्रकल्पासाठी पर्यावरण सचिवांची सही झालेली नाही, त्यामुळे तो पुढे सरकू शकला नसल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)