शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जन्माअगोदरच बाळाच्या आजारांची भाकिते शक्य

By admin | Updated: January 20, 2016 01:30 IST

बायोइन्फॉरमेटिक्सच्या क्षेत्रात जगात वेगाने अत्याधुनिक संशोधन केले जात आहे. मात्र, त्या तुलनेत भारतातील संशोधन खूपच मागे आहे.

पुणे : बायोइन्फॉरमेटिक्सच्या क्षेत्रात जगात वेगाने अत्याधुनिक संशोधन केले जात आहे. मात्र, त्या तुलनेत भारतातील संशोधन खूपच मागे आहे. पण भारतातील या क्षेत्रातील काही संस्था त्यावर चांगले संशोधन करीत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत या तंत्रज्ञानामुळे बाळ जन्माला येण्याअगोदरच त्याला होणाऱ्या आजारांची भाकिते वर्तविता येऊ शकतील, अशी माहिती पश्चिम बंगालमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बायोमेडिकल जिनॉमिस (एनआयबीएमजी) संस्थेचे संचालक पार्थ मुजुमदार यांनी दिली.सेंटर फॉर डेव्हलपिंग आॅफ अ‍ॅडव्हान्स कम्युटिंग (सीडॅक), बायो इन्फॉर्मेटिक्स व बायोइन्फॉर्मेटिक्स रिसोर्स अ‍ॅन्ड अ‍ॅप्लिकेशन फॅसिलिटी (बीआरएएफ) यांनी ‘अ‍ॅसलरेटिंग बायोलॉजी’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्र शासनाच्या बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टिम नेटवर्कचे अध्यक्ष आलोक भट्टाचार्य, सीडॅकचे महासंचालक रजत मुना, संचालक हेमंत दरबारी, राजेंद्र जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.मुजुमदार म्हणाले, की बायोलॉजी व त्याच्याची निगडित सर्व क्षेत्रांतील सर्व डाटांचे डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याकडे सुपरकॉम्प्युटर उपलब्ध आहेत. हा सर्व डाटा संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी देशस्तरावर उपलब्ध व्हायला हवा. उपलब्ध होणारा डाटा आणि त्यावर होणारे प्रोसेसिंग यांचा वेग वाढायला हवा आणि त्यासाठी असे अ‍ॅप्लिकेशन्स निर्माण होणे गरजेचे आहे. या डाटांच्या माध्यमातून बायोमेडिकल जिनॉमिसवर बरेच संशोधन केले जाऊ शकते. याचा प्रयत्न आमच्या एनआयबीएमजी संस्थेत सुरू आहे. त्यामुळे आई-वडील आणि एकूणच कुटुंबांतील व्यक्तींच्या माहितीच्या आधारे जन्माला येण्याअगोदरच बाळाला काय आजार आहेत, होऊ शकतात याचे भाकीत करता येईल आणि ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, तो होऊ नये म्हणून काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करता येईल.भट्टाचार्य म्हणाले, की बायोइन्फॉर्मेटिक्स क्षेत्रात सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या क्षेत्रात येणारे सर्व विद्यार्थी हे बायोलॉजीचे शिक्षण घेऊन आलेले असतात. परंतु, त्यांना त्याचे ज्ञानच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या संशोधनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी शिक्षण व्यवस्थेतही बदल करणे गरजेचे आहे. रजत मुना यांनी मनोगत व्यक्त केले.