शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

अढीवाचनाने श्रीक्षेत्र वीर येथे पीक पेरणीचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:09 IST

परिंचे : खरिपातील बाजरी व ज्वारी पिकास मध्यम वातावरण राहील तर रब्बी हंगामीतील सर्वच पिकांसाठी उत्तम हवामान व समाधानकारक ...

परिंचे : खरिपातील बाजरी व ज्वारी पिकास मध्यम वातावरण राहील तर रब्बी हंगामीतील सर्वच पिकांसाठी उत्तम हवामान व समाधानकारक पाऊस असेल, असे भाकीत श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे करण्यात आले. कोरोना काळातील नियमाचे पालन करीत मोजकेच मानकरी, सालकरी, देवस्थान ट्रस्टचे आजी माजी विश्वस्त पदाधिकारी पुजारी ब्राम्हण देऊळवाड्यात उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने मंदिराचे आवारात असणाऱ्या अढीत पाडव्याच्या अगोदर एक दिवसआधी वडाच्या पानांच्या पुडीत पेरणी करण्यात येणारे धान्य ठेवण्यात येते. बारा महिन्यांच्या बारा खड्ड्यांतून व चार दिशांचे चार खड्ड्यांतून हे धान्य ठेवले जाते. ज्या महिन्यात शेतकरी ज्या ज्या धान्याची पेरणी करतो, त्या खड्ड्यात ते धान्य ठेवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते विधिवत अढींची पूजा करण्यात आली, मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्यापासून सुरूवात करून फाल्गुन महिन्यापर्यंतच्या अढीतील वडाच्या पानात बांधलेल्या धान्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. यामध्ये तीन प्रकारच्या पुड्या दिसून येतात. ज्या धान्याला मोड आलेले असतात ते पीक चांगले समजण्यात येते. जी पुडी ओलसर निघते ते पीक मध्यम तर जी पुडी कोरडी निघते ते पीक येत नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे. चार दिशांच्या खड्ड्यांतून सर्व एकत्रित धान्य ठेवले जाते. त्यास अंबर म्हणतात. या वर्षी चारही दिशांच्या अंबर चांगल्या निघाल्या, परंतु ज्येष्ठ व आषाढ महिन्यातील बाजरी कोरडी निघाली, कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील ज्वारी मध्यम निघाली. या महिन्यातील गहू, हरभरा, भुईमूग पीक चांगले निघाले. या अढीच्या भाकिताबाबत माहिती देताना पुरोहित दीपक थिटे यांनी सांगितले की खरिपातील बाजरी पिकास हवामान मध्यम व रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भूईमूग, जवस, मिरची, खपला, भेंडी पिकाला पाणी व हवामान पोषक असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करावे. या कार्यक्रमात गेली अनेक वर्षांपासून कुमारआप्पा धुमाळ अढी वाचण्यास मदत करतात.

अढीद्वारे पीक पेरणीचे करण्यात येणारे भाकीत ऐकण्यासाठी काही मोजक्याच शेतकऱ्यांची मंदिराच्या परिसरात उपस्थिती होती. भाकिताप्रमाणे शेतकरी पेरणी करतात. मंदिरात होणारी यात्रेच्या वेळची भाकणूक व पाडव्याच्या वेळी अढीद्वारे होणारे पेरणीचे भाकीत खरे ठरते अशी प्रचीती येते.

फोटो ओळ--श्रीक्षेत्र वीर येथे म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे पीक पेरणीचे भाकीत करण्यात आले.

A