शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अढीवाचनाने श्रीक्षेत्र वीर येथे पीक पेरणीचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:09 IST

परिंचे : खरिपातील बाजरी व ज्वारी पिकास मध्यम वातावरण राहील तर रब्बी हंगामीतील सर्वच पिकांसाठी उत्तम हवामान व समाधानकारक ...

परिंचे : खरिपातील बाजरी व ज्वारी पिकास मध्यम वातावरण राहील तर रब्बी हंगामीतील सर्वच पिकांसाठी उत्तम हवामान व समाधानकारक पाऊस असेल, असे भाकीत श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे करण्यात आले. कोरोना काळातील नियमाचे पालन करीत मोजकेच मानकरी, सालकरी, देवस्थान ट्रस्टचे आजी माजी विश्वस्त पदाधिकारी पुजारी ब्राम्हण देऊळवाड्यात उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने मंदिराचे आवारात असणाऱ्या अढीत पाडव्याच्या अगोदर एक दिवसआधी वडाच्या पानांच्या पुडीत पेरणी करण्यात येणारे धान्य ठेवण्यात येते. बारा महिन्यांच्या बारा खड्ड्यांतून व चार दिशांचे चार खड्ड्यांतून हे धान्य ठेवले जाते. ज्या महिन्यात शेतकरी ज्या ज्या धान्याची पेरणी करतो, त्या खड्ड्यात ते धान्य ठेवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते विधिवत अढींची पूजा करण्यात आली, मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्यापासून सुरूवात करून फाल्गुन महिन्यापर्यंतच्या अढीतील वडाच्या पानात बांधलेल्या धान्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. यामध्ये तीन प्रकारच्या पुड्या दिसून येतात. ज्या धान्याला मोड आलेले असतात ते पीक चांगले समजण्यात येते. जी पुडी ओलसर निघते ते पीक मध्यम तर जी पुडी कोरडी निघते ते पीक येत नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे. चार दिशांच्या खड्ड्यांतून सर्व एकत्रित धान्य ठेवले जाते. त्यास अंबर म्हणतात. या वर्षी चारही दिशांच्या अंबर चांगल्या निघाल्या, परंतु ज्येष्ठ व आषाढ महिन्यातील बाजरी कोरडी निघाली, कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील ज्वारी मध्यम निघाली. या महिन्यातील गहू, हरभरा, भुईमूग पीक चांगले निघाले. या अढीच्या भाकिताबाबत माहिती देताना पुरोहित दीपक थिटे यांनी सांगितले की खरिपातील बाजरी पिकास हवामान मध्यम व रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भूईमूग, जवस, मिरची, खपला, भेंडी पिकाला पाणी व हवामान पोषक असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करावे. या कार्यक्रमात गेली अनेक वर्षांपासून कुमारआप्पा धुमाळ अढी वाचण्यास मदत करतात.

अढीद्वारे पीक पेरणीचे करण्यात येणारे भाकीत ऐकण्यासाठी काही मोजक्याच शेतकऱ्यांची मंदिराच्या परिसरात उपस्थिती होती. भाकिताप्रमाणे शेतकरी पेरणी करतात. मंदिरात होणारी यात्रेच्या वेळची भाकणूक व पाडव्याच्या वेळी अढीद्वारे होणारे पेरणीचे भाकीत खरे ठरते अशी प्रचीती येते.

फोटो ओळ--श्रीक्षेत्र वीर येथे म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे पीक पेरणीचे भाकीत करण्यात आले.

A