शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोआॅपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील निवृत्त एटीएस अधिका-याचा अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST

पुणे : धनकवडीमधील आदर्श नगरी को-आॅपरेटिव्ह बँकेतील 47 कोटी रूपयांच्या घोटाळ्यातील दहतशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) निवृत्त पोलीस उपनिरीक्षक, त्यांची ...

पुणे : धनकवडीमधील आदर्श नगरी को-आॅपरेटिव्ह बँकेतील 47 कोटी रूपयांच्या घोटाळ्यातील दहतशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) निवृत्त पोलीस उपनिरीक्षक, त्यांची पत्नी आणि इतर सहा जण अशा आठ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने गुरूवारी ( दि.7) फेटाळला. बॅंकेचे संचालकपद स्वीकारताना माजी पोलीस उपनिरीक्षकाने शासनाची परवानगी घेतली होती का? यासह संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे गरजेचे आहे अशा सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला ग्राहय धरत आठही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.

गेल्या आठवड्यात सहकारनगर पोलिसांनी या बँक घोटाळ्यात मंडळाचे संचालक, मँनेजर, कँशिअर अशा जवळपास 63 व्यक्तींवर कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र न्यायालयाने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरवे, त्यांची पत्नी अश्विनी थोरवे, शासकीय लेखापरीक्षक पांडुरंग रणदिवे आणि प्रदीप कुलकर्णी, निवृत्त शासकीय लेखापरीक्षक दादाभाऊ काळे, बँकेचे लेखापरीक्षक रमेश वाणी आणि अजय रंडेर तसेच बँकेचे संचालक उमेश कांबळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने वकिलांनी युक्तीवाद केला की थोरवे आणि त्यांच्या पत्नी दोघेही बँकेचे शेअरहोल्डर आहेत. पण बँकेचे संचालक म्हणून जॉईन करून घेण्यासाठी ते मंडळाकडे कधी गेले नाहीत.तरीही ते 1996 ते 2017 दरम्यान बँकेचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे याची त्यांना कल्पना नव्हती. बोर्डाचे चेअरमन आणि इतर सदस्यांनी थोरवे हे संचालक असल्याचे भासवले. दरम्यान, शासकीय लेखापरीक्षकांनी या प्रकरणाशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र सरकारी वकील राजेश कवेडिया यांनी बचाव पक्षाचा

युक्तीवाद खोडून काढला. थोरवे हे पोलीस सेवेत काम करत असतानाही कॉआॅपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून मार्च 1996 ते 2005 दरम्यान वावरत होते. या काळात बँकेच्या 15 बोर्ड मिटींगला ते उपस्थित होते. त्यामुळे कर्ज मंजूरी आणि बँकेच्या सर्व व्यवहाराशी ते अवगत होते. त्यामुळे बँकेच्या संचालकपदाबाबत आपण अनभिज्ञ आहोत असा दावा ते करू शकत नाहीत. तसेच बँकेचे संचालकपद स्वीकारताना माजी पोलीस उपनिरीक्षकाने शासनाची परवानगी घेतली होती का? यासह संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे

गरजेचे आहे. रणदिवे आणि इतर लेखापरीक्षकांना कर्जासाठी सादर झालेली कागदपत्रे अपूर्ण आहेत हे माहिती होते. तरीही कोणतीही वस्तू गहाण न ठेवता कर्ज मंजूर करण्यात आली. 2004-2005 ला बँकेला 98 लाखाचे नुकसान झाले तरी

लेखापरीक्षकांनी बँक नफ्यात असल्याचे दाखविले. त्यांनी त्यांची कर्तव्य योग्य प्रकारे निभावली नाहीत असे कवेडोया यांनी नमूद केले. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आठही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

----------------------------------------------