शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

प्रातोप्रांतीचे क्रांतिकारक- तमिळनाडूचा स्वाभिमानी राजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने ...

जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने गुन्हेगारांवर वचक बसवला. त्यामुळे अल्पावधीतच तो आपल्या प्रजेच्या लाडका राजा झाला.

पंचलमकुरुच्चीच्या आजूबाजूंची बहुतेक राज्ये इंग्रजांच्या ताब्यात आली होती. त्यांनी बोम्मूराजाकडेही खंडणी मागितली. परंतु अत्यंत तडफदारपणे बोम्मूराजाने खंडणी नाकारली व युद्धाची तयारी सुरू केली, तरीही जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याने बोम्मूराजास भेटीस बोलावले. मुका भाऊ उमैदौरे याला कपटाची शंका आल्यामुळे त्याने बोम्मूराजाबरोबर साध्या वेषातील अनेक सैनिक पाठवले. प्रत्यक्ष भेटीत जॅक्सनने त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बोम्मूराजाला कैद करण्याऱ्या लेफ्टनंट क्लार्क याला बोम्मूराजाने ठार मारले. इंग्रजी सैन्याचा पराभव करून बोम्मूराजा व उमैदौरे निसटून आले. त्याचा सेनापती मात्र पकडला गेला.

जॅक्सनच्या जागी आलेल्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितली व आजूबाजूंचा आणखीन प्रदेश ताब्यात घेतला. जॉन बॅनरमन यांच्या आधिपत्याखाली इंग्रज सैन्याने ऑगस्ट १७९९ मध्ये पंचलमकुरुच्चीवर हल्ला केला. स्वतः बोम्मूराजा युद्धासाठी बाहेर पडला. किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याजवळ तुंबळ लढाई झाली . बोम्मूराजा या लढाईतून निसटला आणि पंचलमकुरुच्ची इंग्रजांनी जिंकली. बोम्मूराजा आणि त्याचे भाऊ व विश्वासू सरदारांनी जंगलात आश्रय घेतला होता. परंतु टोण्डैमान नावाच्या जमीनदाराने विश्वासघाताने बोम्मूराजाला पकडून दिले. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे खटल्याचे नाटक झाले. बोम्मूराजाने माफी मागण्याचे नाकारले. १६ ऑक्टोबर १७९९ या दिवशी सर्व जनतेसमोर इंग्रजांनी बोम्मूराजा म्हणजेच वीरपांड्य कट्टबोम्मन यास फासावर चढवले. फासावर जाण्यापूर्वी भूमीवरची माती आपल्या डोक्याला लावून त्याने भूमीवर डोके टेकवले. बोम्मूराजाच्या मृत्यूनंतरही उमैदौरे आणि दोरेसिंह या भावांनी तुरुंगातून सुटका करून घेतली व पुन्हा लढा देण्यास सुरुवात केली. एका लढाईत मॅकेले या इंग्रज अधिकाऱ्याचा त्यांनी पराभवही केला.

बोम्मूराजाच्या मृत्यूमुळे जनता इंग्रजांविरुद्ध अधिकच चिडली होती. पंचलमकुरुच्चीचा किल्ला जिंकून उमैदौरे याने किल्ल्याची डागडुजी केली. परंतु अखेरच्या युद्धात ते दोघेही भाऊ मारले गेले .आपल्या राज्याच्या स्वतंत्रतेसाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या वीरपांड्य कात्ताबोम्मन आणि त्याचे दोन भाऊ उमैदौरे व दोरेसिंह यांच्या बलिदानामुळे तमिळनाडूमध्ये इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ वाढू लागला .