शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

प्रातोप्रांतीचे क्रांतिकारक- तमिळनाडूचा स्वाभिमानी राजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने ...

जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने गुन्हेगारांवर वचक बसवला. त्यामुळे अल्पावधीतच तो आपल्या प्रजेच्या लाडका राजा झाला.

पंचलमकुरुच्चीच्या आजूबाजूंची बहुतेक राज्ये इंग्रजांच्या ताब्यात आली होती. त्यांनी बोम्मूराजाकडेही खंडणी मागितली. परंतु अत्यंत तडफदारपणे बोम्मूराजाने खंडणी नाकारली व युद्धाची तयारी सुरू केली, तरीही जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याने बोम्मूराजास भेटीस बोलावले. मुका भाऊ उमैदौरे याला कपटाची शंका आल्यामुळे त्याने बोम्मूराजाबरोबर साध्या वेषातील अनेक सैनिक पाठवले. प्रत्यक्ष भेटीत जॅक्सनने त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बोम्मूराजाला कैद करण्याऱ्या लेफ्टनंट क्लार्क याला बोम्मूराजाने ठार मारले. इंग्रजी सैन्याचा पराभव करून बोम्मूराजा व उमैदौरे निसटून आले. त्याचा सेनापती मात्र पकडला गेला.

जॅक्सनच्या जागी आलेल्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितली व आजूबाजूंचा आणखीन प्रदेश ताब्यात घेतला. जॉन बॅनरमन यांच्या आधिपत्याखाली इंग्रज सैन्याने ऑगस्ट १७९९ मध्ये पंचलमकुरुच्चीवर हल्ला केला. स्वतः बोम्मूराजा युद्धासाठी बाहेर पडला. किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याजवळ तुंबळ लढाई झाली . बोम्मूराजा या लढाईतून निसटला आणि पंचलमकुरुच्ची इंग्रजांनी जिंकली. बोम्मूराजा आणि त्याचे भाऊ व विश्वासू सरदारांनी जंगलात आश्रय घेतला होता. परंतु टोण्डैमान नावाच्या जमीनदाराने विश्वासघाताने बोम्मूराजाला पकडून दिले. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे खटल्याचे नाटक झाले. बोम्मूराजाने माफी मागण्याचे नाकारले. १६ ऑक्टोबर १७९९ या दिवशी सर्व जनतेसमोर इंग्रजांनी बोम्मूराजा म्हणजेच वीरपांड्य कट्टबोम्मन यास फासावर चढवले. फासावर जाण्यापूर्वी भूमीवरची माती आपल्या डोक्याला लावून त्याने भूमीवर डोके टेकवले. बोम्मूराजाच्या मृत्यूनंतरही उमैदौरे आणि दोरेसिंह या भावांनी तुरुंगातून सुटका करून घेतली व पुन्हा लढा देण्यास सुरुवात केली. एका लढाईत मॅकेले या इंग्रज अधिकाऱ्याचा त्यांनी पराभवही केला.

बोम्मूराजाच्या मृत्यूमुळे जनता इंग्रजांविरुद्ध अधिकच चिडली होती. पंचलमकुरुच्चीचा किल्ला जिंकून उमैदौरे याने किल्ल्याची डागडुजी केली. परंतु अखेरच्या युद्धात ते दोघेही भाऊ मारले गेले .आपल्या राज्याच्या स्वतंत्रतेसाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या वीरपांड्य कात्ताबोम्मन आणि त्याचे दोन भाऊ उमैदौरे व दोरेसिंह यांच्या बलिदानामुळे तमिळनाडूमध्ये इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ वाढू लागला .