शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

डॉक्टरांमुळे सुनीलच्या जगण्यात आले प्राण

By admin | Updated: April 9, 2017 04:32 IST

रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये

भोसरी : रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखविण्यात आले़ मात्र, याचे आॅपरेशन होऊ शकत नाही, आॅपरेशन केले तरी फारसा उपयोग होणार नाही, असे सुनीलच्या पालकांना सांगण्यात आले. येथील वायसीएम हॉस्पिटलचे न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सुनीलच्या चेतनाशून्य अवयवांमध्ये जणू प्राण फुंकले. अत्यंत क्लिष्ट अशी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, पंधरा दिवसांत सुनील चालू शकेल, असा विश्वास डॉ. वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील गोताळा या छोट्याशा गावात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या राम व लक्ष्मी जाधव या दाम्पत्याचा सुनील हा १० वर्षांचा मुलगा. त्याच्या या आजाराविषयी ते सांगत होते, लहानपणापासूनच त्याची मान जखडली होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य नव्हते. त्याचे वय वाढले तसे या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली. मान व त्यानंतर हळूहळू हात व पायाची हालचाल मंदावली. उचलून घेऊनच त्याला शाळेत घेऊन जायला लागायचे. आधाराशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. आमचा मुलाने इतर मुलांप्रमाणे खेळावे, बागडावे असे वाटत होते; पण या आजाराने त्याला जायबंदी करून ठेवले होते. त्याला लातूर येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविले; पण डॉक्टरांनी उपचार होऊ शकणार नाही, असे त्याची आई लक्ष्मी जाधव यांना सांगितले. काय करावे काहीच सुचत नव्हते. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे आॅपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल, असे लोक सांगत तेव्हा मन दु:खी व्हायचे. वायसीएम हॉस्पिटलविषयी बोलताना राम जाधव यांनी सांगितले की, ‘आमचा मोठा मुलगा भोसरीत एका कंपनीत कामाला आहे. त्याने आम्हाला सुनीलला घेऊन पुण्यास येण्यास सांगितले. एक महिन्यापूर्वी आम्ही हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांना सुनीलला दाखविले. त्यांनी सर्व तपासण्या करून आॅपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सुनीलचे आॅपरेशन करण्यात आले. डॉ. वाघ म्हणाले, शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे डॉ. के. अनिल रॉय यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेच. तसेच डॉ. मनोज देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. मुग्धा मार्कण्डेय, डॉ. राजेश गोरे, यांचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)हा आजार दुर्मिळ असून, लाखात एकाला होतो. यामुळे मेंदूतून येणारी शिर दबल्यामुळे शरीराच्या हालचाली बंद पडू शकतात. सुनीलच्या या आजारात मेंदूतून येणारी नस एक व दोन नंबरच्या मणक्यामध्ये दबली होती. त्यामुळे त्याची मान, हात व पाय जखडले होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व जोखमीची असल्यामुळे सहसा डॉक्टर अशी शस्त्रक्रिया करण्यास धजावत नाहीत. शक्यतो असा आजार हा जन्मत: किंवा कष्टकरी, कामगार यांच्यामध्ये वाढू शकतो. हा आजार दुर्मिळ असला तरी योग्य निदान व उपचारामुळे तो पूर्ण बरा होऊ शकतो. माझ्यासाठी हे एक आव्हान होते. - डॉ. अमित वाघ, न्युरो सर्जनलहानपणापासून आमच्या मुलाची मान वाकडी झाली होती. दवापाण्यासाठी जवळ पैसा नव्हता. हळूहळू त्याचा हा आजार वाढत गेला़ त्याचे हात-पाय जायबंदी झाले. खूप दवाखाने केले; पण काही उपयोग झाला नाही. शेवटी वायसीएम हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. इथल्या डाक्टरांनी आमच्या पोराला जीवदान दिले. आमचा मुलगा आता खेळेल, बागडेल, शाळेत जाईल याचा मोठा आनंद आम्हाला होईल. डाक्टर अमित वाघ यांच्या रूपाने आमच्या पोरासाठी देवच धावून आला आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही.- राम जाधव, वडील