शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

डॉक्टरांमुळे सुनीलच्या जगण्यात आले प्राण

By admin | Updated: April 9, 2017 04:32 IST

रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये

भोसरी : रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखविण्यात आले़ मात्र, याचे आॅपरेशन होऊ शकत नाही, आॅपरेशन केले तरी फारसा उपयोग होणार नाही, असे सुनीलच्या पालकांना सांगण्यात आले. येथील वायसीएम हॉस्पिटलचे न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सुनीलच्या चेतनाशून्य अवयवांमध्ये जणू प्राण फुंकले. अत्यंत क्लिष्ट अशी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, पंधरा दिवसांत सुनील चालू शकेल, असा विश्वास डॉ. वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील गोताळा या छोट्याशा गावात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या राम व लक्ष्मी जाधव या दाम्पत्याचा सुनील हा १० वर्षांचा मुलगा. त्याच्या या आजाराविषयी ते सांगत होते, लहानपणापासूनच त्याची मान जखडली होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य नव्हते. त्याचे वय वाढले तसे या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली. मान व त्यानंतर हळूहळू हात व पायाची हालचाल मंदावली. उचलून घेऊनच त्याला शाळेत घेऊन जायला लागायचे. आधाराशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. आमचा मुलाने इतर मुलांप्रमाणे खेळावे, बागडावे असे वाटत होते; पण या आजाराने त्याला जायबंदी करून ठेवले होते. त्याला लातूर येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविले; पण डॉक्टरांनी उपचार होऊ शकणार नाही, असे त्याची आई लक्ष्मी जाधव यांना सांगितले. काय करावे काहीच सुचत नव्हते. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे आॅपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल, असे लोक सांगत तेव्हा मन दु:खी व्हायचे. वायसीएम हॉस्पिटलविषयी बोलताना राम जाधव यांनी सांगितले की, ‘आमचा मोठा मुलगा भोसरीत एका कंपनीत कामाला आहे. त्याने आम्हाला सुनीलला घेऊन पुण्यास येण्यास सांगितले. एक महिन्यापूर्वी आम्ही हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांना सुनीलला दाखविले. त्यांनी सर्व तपासण्या करून आॅपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सुनीलचे आॅपरेशन करण्यात आले. डॉ. वाघ म्हणाले, शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे डॉ. के. अनिल रॉय यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेच. तसेच डॉ. मनोज देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. मुग्धा मार्कण्डेय, डॉ. राजेश गोरे, यांचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)हा आजार दुर्मिळ असून, लाखात एकाला होतो. यामुळे मेंदूतून येणारी शिर दबल्यामुळे शरीराच्या हालचाली बंद पडू शकतात. सुनीलच्या या आजारात मेंदूतून येणारी नस एक व दोन नंबरच्या मणक्यामध्ये दबली होती. त्यामुळे त्याची मान, हात व पाय जखडले होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व जोखमीची असल्यामुळे सहसा डॉक्टर अशी शस्त्रक्रिया करण्यास धजावत नाहीत. शक्यतो असा आजार हा जन्मत: किंवा कष्टकरी, कामगार यांच्यामध्ये वाढू शकतो. हा आजार दुर्मिळ असला तरी योग्य निदान व उपचारामुळे तो पूर्ण बरा होऊ शकतो. माझ्यासाठी हे एक आव्हान होते. - डॉ. अमित वाघ, न्युरो सर्जनलहानपणापासून आमच्या मुलाची मान वाकडी झाली होती. दवापाण्यासाठी जवळ पैसा नव्हता. हळूहळू त्याचा हा आजार वाढत गेला़ त्याचे हात-पाय जायबंदी झाले. खूप दवाखाने केले; पण काही उपयोग झाला नाही. शेवटी वायसीएम हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. इथल्या डाक्टरांनी आमच्या पोराला जीवदान दिले. आमचा मुलगा आता खेळेल, बागडेल, शाळेत जाईल याचा मोठा आनंद आम्हाला होईल. डाक्टर अमित वाघ यांच्या रूपाने आमच्या पोरासाठी देवच धावून आला आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही.- राम जाधव, वडील