शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पाणी सोडल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक

By admin | Updated: March 30, 2016 02:07 IST

भामा आसखेड धरणामधून दौंड तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी धरणावर धरणग्रस्तांनी जमून पाणी सोडण्याचा निषेध केला.

पाईट : भामा आसखेड धरणामधून दौंड तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी धरणावर धरणग्रस्तांनी जमून पाणी सोडण्याचा निषेध केला. या वेळी जमावबंदी आदेश असल्याने धरणग्रस्तांनी इशारा देत येत्या दोन दिवसांमध्ये तातडीने तोडगा काढला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून सध्या भामा आसखेडमधून ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडण्यामुळे प्रकल्पबाधित गावांमधील शेतीला, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या ठिकाणी तालुक्यातील शेतीचा कोणताही विचार न करता पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी धरणग्रस्तांची बाजू ऐकून घेतली. येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्याबाबतची भूमिका भामा आसखेड धरणावर येऊन जाहीर केली नाही, तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी महादेव लिंभोरे, कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, दत्ता होल, रामदास खेंगले, धोंडिभाऊ कुडेकर, शंकर खेंगले, संभाजी कोळेकर, नवनाथ दरेकर, तुकाराम लिंभोरे, काशिनाथ लिंभोरे, किसन नवले, शुकराज लिंभोरे, संजय कोळेकर, भगुजी नवले, नितीन रायकर आदी शेतकरी जमा झाले होते.