शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

गुऱ्हाळांमध्ये पीपीई किट, मास्कचा जळण म्हणून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST

केडगाव : येथील परप्रांतीय गुऱ्हाळघरांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा वापर जळण म्हणून ...

केडगाव : येथील परप्रांतीय गुऱ्हाळघरांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा वापर जळण म्हणून करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० ते १५ टनांपर्यंत कचऱ्याच्या गाड्या खाली होत आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोठ्या रुग्णालयातील हा वैद्यकीय कचरा येत असल्याचे समजते.

केडगाव, दापोडी, खोपोडी येथे परप्रांतीयांची गुऱ्हाळघरे आहेत. या ठिकाणी काही दिवसांपासून कोरोनाकाळात काळामध्ये वैद्यकीय सुविधेमध्ये सुरक्षा म्हणून वापरलेल्या वस्तू जळण म्हणून वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. गुऱ्हाळघरांबाहेर हा वैद्यकीय कचरा साठवला जात आहे. यामध्ये पीपीई किट, मास्क, हातमोज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा कचरा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोठमोठ्या दवाखान्यांतून येत असून, १० ते १५ टनांपर्यंत कचऱ्याच्या गाड्या खाली होत आहे. गुऱ्हाळघरातील परप्रांतीय कामगार कोणतीही सुरक्षितता न बाळगता हा कचरा हातामध्ये घेऊन जळण म्हणून गुऱ्हाळघराच्या तुला चुलीमध्ये घालत आहेत. कचऱ्याला हात लावताना त्यांना कसलीही भीती वाटत नाही. या कचऱ्यामुळे गुऱ्हाळघरातून धूर बाहेर पडत असून वायूप्रदूषण होत आहे.

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष नानासाहेब टेंगले यांनी स्वतः गुऱ्हाळघरावर जाऊन पाहणी केली असता परप्रांतीय कामगार कसलीही काळजी न घेता या वैद्यकीय कचऱ्याला हाताळताना दिसले. विशेष म्हणजे या कचऱ्याची दुर्गंधी येत होती. यासंदर्भात टेंगले यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून संबंधित गुऱ्हाळघरावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांंच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वैद्यकीय कचऱ्याचा गुऱ्हाळ घरांमध्ये जळण म्हणून वापर होणे हा धक्कादायक प्रकार आहे. याबाबत माहिती मिळाली आहे. त्वरित या संदर्भात प्रदूषण कार्यालयाला माहिती दिली असून, अशा गुऱ्हाळघरांवर कारवाई करणार आहे.

संजय पाटील, तहसीलदार दौंड

गुऱ्हाळघरे ठरतायेत असून अडचण नसून खोळंबा

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस पिकवणारा तालुका म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जाते. प्रतिवर्षी दौंड तालुक्यामध्ये आहे २५ लाख टन ऊस पिकवला जातो. त्यामुळे या परिसरात परप्रांतीय ४०० गुऱ्हाळे कार्यरत आहेत. तालुक्यातील साखर कारखाने व गुऱ्हाळामुळे शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर जात आहेत. परंतु या गुऱ्हाळांमुळे सध्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीवघेणे फुप्फुसाचे आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून ही परप्रांतीय गुऱ्हाळे सध्या असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत.