शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

शिवसेनेला सत्ता महत्त्वाची की अस्मिता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST

पुणे : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आणि धरसोडवृत्तीची आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...

पुणे : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आणि धरसोडवृत्तीची आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याविषयी स्पष्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. या मुद्यावर शिवसेना गोंधळलेली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

पुणे दौऱ्यावर आलेल्या दरेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. नामकरणास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला असून संजय निरुपम यांनीही हे सरकार आमच्यामुळे असल्याचे वक्तव्य करीत इशाराच दिला आहे. तर, मंत्री अशोक चव्हाण यांनी हा विषय आमच्या अजेंड्यावर नसल्याचे म्हटले आहे. तर, माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणताहेत की, नामकरणास विरोध केला तर जशास तसे उत्तर देऊ. संजय राऊतांची वक्तव्ये हास्यास्पद आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पालिकेने कोणताही ठराव करून पाठवला नव्हता. नामकरणाबाबत कॅबिनेटने निर्णय घ्यावा, असे दरेकर म्हणाले.

मुळीक म्हणाले, भामा आसखेड योजनापूर्तीवरून श्रेयवाद आणि बॅनरबाजी सुरू आहे. या योजनेसाठी ८० टक्के निधी भाजपा सरकारने दिला होता. महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया दिलेला नाही. त्यांचे शून्य टक्के योगदान आहे; तरीदेखील श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी सुरु आहे. महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करताना राजकीय हेतू समोर ठेवला गेलाय. जिल्हा परिषदेत २३ गावांचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीकडे आहे. पण या गावांचा विकास करू न शकल्यानेच समावेशाचा घाट घालण्यात आला आहे. समावेशाचा राजकीय फायदा होण्यापेक्षा राष्ट्रवादीचा भ्रमनिरास होणार असल्याचे मुळीक म्हणाले.

===

अराजक निर्माण करण्याचा सेनेचा प्रयत्न

शिवसेनेकडून ईडीच्या कारवाईबाबतीत रस्त्यावर आंदोलन करू, असे व्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयालाही सेनेचे नेते मानत नाहीत. केवळ अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

===

सरकारच्या केवळ धमक्या आणि भूलथापा

ईडी लावली तर सीडी लावतो, असे म्हणणारे एकनाथ खडसे सीडी शोधत असावेत. या सरकारच्या केवळ धमक्या आणि भूलथापा सुरू आहेत. मूलभूत प्रश्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिवृष्टी, निसर्ग वादळ, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षण याकरिता कोणीही रस्त्यावर येत नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.