शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वीजजोड तोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी ...

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी महावितरणने

घोषणा झाल्यानंतरही बंद केल्या आहेत

सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर आहे. सक्ती करणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. तरी कंपनीचे अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. त्यातूनच डीपी बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत.

कळस व परिसरात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कळस व गोसावीवाडी परिसरातील गावातील थकीत कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या दारावर धडकल्या त्याप्रमाणे वीजबिल माफीची घोषणा देखील अपेक्षित होती. पण तसे झाले नाही. वीजबिल भरणा करावा लागणार नाही अशीच अपेक्षा अनेकांची होती. अनेकांनी बिल भरले नाही

वीज पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे प्रमाणे बिलाची वसुली करावी, शेतकर्‍यांसाठी असणारी कृषी संजीवनी योजना समजावून सांगून त्याप्रमाणे वसुलीची अंमलबजावणी करावी. थकीत वीज बिलासाठी योग्य प्रमाणात हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

चौकट

गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी विधीमंडळात स्थगितीची घोषणा झाल्यानंतरही सोडवण्यात आल्या आहेत आमचे पिण्याचे पाणी व शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. घरामध्येही लाईट नसल्याने अंधारात राहावे लागणार आहे.

विजय खर्चे ,ग्रामपंचायत सदस्य

.

महावितरण विभागाकडून कोणताही डीपी बंद करण्यात आला असल्यास कर्मचारी विभागाला तो पुन्हा जोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मोहन सुळ,वालचंदनगर उपविभाग,कार्यकारी अभियंता