शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वीजजोड तोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी ...

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी महावितरणने

घोषणा झाल्यानंतरही बंद केल्या आहेत

सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर आहे. सक्ती करणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. तरी कंपनीचे अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. त्यातूनच डीपी बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत.

कळस व परिसरात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कळस व गोसावीवाडी परिसरातील गावातील थकीत कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या दारावर धडकल्या त्याप्रमाणे वीजबिल माफीची घोषणा देखील अपेक्षित होती. पण तसे झाले नाही. वीजबिल भरणा करावा लागणार नाही अशीच अपेक्षा अनेकांची होती. अनेकांनी बिल भरले नाही

वीज पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे प्रमाणे बिलाची वसुली करावी, शेतकर्‍यांसाठी असणारी कृषी संजीवनी योजना समजावून सांगून त्याप्रमाणे वसुलीची अंमलबजावणी करावी. थकीत वीज बिलासाठी योग्य प्रमाणात हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

चौकट

गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी विधीमंडळात स्थगितीची घोषणा झाल्यानंतरही सोडवण्यात आल्या आहेत आमचे पिण्याचे पाणी व शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. घरामध्येही लाईट नसल्याने अंधारात राहावे लागणार आहे.

विजय खर्चे ,ग्रामपंचायत सदस्य

.

महावितरण विभागाकडून कोणताही डीपी बंद करण्यात आला असल्यास कर्मचारी विभागाला तो पुन्हा जोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मोहन सुळ,वालचंदनगर उपविभाग,कार्यकारी अभियंता