शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य रेषेच्या आर्थिक मर्यादेत २० वर्षात वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दारिद्र्य रेषेखालील शिधा पत्रिकेसाठी सरकारने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये या मर्यादेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दारिद्र्य रेषेखालील शिधा पत्रिकेसाठी सरकारने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये या मर्यादेत गेल्या २० वर्षात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांसारखे अनेक कष्टकरी या मर्यादेत येत नाहीत. त्यांना राज्य सरकारच्या एकाही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न मर्यादा वार्षिक सव्वा लाख रुपये करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

कोरोना टाळेबंदीत व्यवसाय गमावून बसलेल्या रिक्षा चालकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळावे म्हणून मागणी करताना आप रिक्षा संघटनेच्या लक्षात ही बाब आली. रिक्षा चालकांसह कष्टकरी श्रमिक वर्गातील अनेक कुुटंबे सरकारच्या दारिद्र्य रेषेखालीलच्या व्याख्येत बसत नसल्याने स्वस्त धान्य योजनेसह अनेक सरकारी योजनांसाठी हा वर्ग अपात्र ठरतो. जिल्हा पुरवठा अधिकारी स्मिता मोरे यांच्याकडे पक्षाने यासंदर्भातील निवेदन दिले आहे. आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, डॉ. अभिजित मोरे, गणेश ढमाले, अनुप शर्मा यावेळी उपस्थित होते.

आम आदमी रिक्षा संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत आचार्य यांनी सांगितले की, २० वर्षात महागाई निर्देशांक कितीतरी वाढला. त्या तुलनेत या मर्यादेतही वाढ करायला हवी. संघटनेने एका रिक्षाचालकाच्या कुटुंबाच्या सर्वसाधारण खर्चावरून वर्षाचा अंदाज काढला. अगदी कमी प्रतीचे स्वस्तातील दूध विचारात घेऊनही हा खर्च वर्षाला १ लाख २७ हजार रूपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे.

आचार्य यांनी सांगितले की रिक्षाचालकांना स्वस्त धान्य दुकानातील २ रूपये किलो धान्य देण्यासंदर्भात विचारले असता ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठीच असल्याचे स्पष्ट झाले. दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न मर्यादा केंद्र सरकार निश्चित करते. आहे. त्यामुळे आप सर्व खासदारांना याविषयी कळवणार आहे. मर्यादा वाढवल्यास स्वस्त धान्य योजनेत रिक्षाचालकांसह अन्य कष्टकरी वर्गाचाही समावेश होईल.