शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सरपंचांच्या सह्यांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या आदेशाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST

या विरोधात सरपंचांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना विकास कामासाठी प्राप्त होणारा निधी जमा ...

या विरोधात सरपंचांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना विकास कामासाठी प्राप्त होणारा निधी जमा करण्यासाठी 'जिल्हा परिषद विकास योजना ग्रामपंचायत' या नावे गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त स्वतंत्र खाते ग्रामपंचायत स्तरावर उघडण्याचा आदेश देण्यात आले होते. या निर्णयास विविध गावांच्या सरपंचांनी व्यक्त करून निषेध व्यक्त केला. हा निर्णय सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याची भावना व्यक्त करून सर्व सरपंचांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आदेशात दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व सरपंच संघटनेने दिला होता.

जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना विकास कामासाठी प्राप्त होणारा निधी या पूर्वी ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावे संयुक्त असलेल्या ग्रामनिधी या खात्यात जमा होत असे. सदस्यांची मासिक सभा घेऊन हा निधी खर्च करण्याचे अधिकार ग्रामसेवक व सरपंच यांना होते. मात्र, काही ग्रामपंचायत या निधीचा गैरवापर करत असल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे महसुली नुकसान होऊ नये, जिल्हा परिषदेच्या निधीचा गैरवापर होऊ नये, ज्या कामासाठी निधी दिला आहे, त्याच कामावर निधी खर्च व्हावा, विकास कामे मुदतीत पूर्ण व्हावी, ठेकेदाराला वेळेवर देयके अदा व्हावीत, या हेतूने जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना विकास कामासाठी प्राप्त होणारा निधी जमा करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत १२ मेपर्यंत

गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे 'जिल्हा परिषद विकास योजना ग्रामपंचायत' या नावे संयुक्त स्वतंत्र खाते काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना ४ मे रोजी दिले होते.

सरपंचांच्या मागणीचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी पूर्वी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करून ग्रामसेवक व सरपंच यांचे संयुक्त स्वतंत्र खाते ग्रामपंचायत स्तरावर उघडण्यास काही अटीनुसार अनुमती दिली आहे. सुधारित आदेशानुसार या खात्यातील निधी योजना कालावधीत खर्च करणे बंधनकारक असून, निधी खर्च न झाल्यास योजना कालावधीत पूर्ण होताच हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे बंधनकारक राहणार आहे. या खात्यात जमा होणारे व्याज खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला राहणार नाही. व्याज पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला जमा करणे बंधनकारक असल्याचे नव्या सुधारित आदेशात म्हटले आहे.