शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अंतर्गत गुणांच्या त्रुटीवरील चौकशीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:11 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने ...

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.या कालावधीत वारंवार परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची नावे दर आठ-पंधरा दिवसांनी महाविद्यालयाकडे अंतर्गत गुण भरण्यासाठी पाठविली जात होती. कोरोना काळात प्राध्यापकांनी महाविद्यालयात येऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे काम पूर्ण केले. मात्र, अनावधानाने एक ते दोन विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे राहून गेले. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांना विद्यापीठात प्रमाद समितीसमोर चौकशीसाठी बोलवले.त्यामुळे प्राध्यापक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली.

कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्राध्यापकांनी विद्यापीठाला सर्वोतोपरी सहकार्य केले. काही तांत्रिक कारणास्तव किंवा अनावधानाने प्राध्यापकांकडून गुण भरताना तृटी राहून गेल्याने थेट त्यांना परीक्षा विभागात बोलावून घेणे योग्य नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात गर्दी करणे उचित नाही. यामुळे विद्यापीठाने या प्रक्रियेस तात्काळ स्थिगिती द्यावी, अशी मागणी प्रध्यापक संघटनेने केली. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये एकाही प्राध्यापकावर कारवाई केली जाणार नसल्याचा ठराव झाला होता. तरीही कारवाई केली जात असल्याने प्राध्यापक संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. तसेच केवळ प्राध्यापकांकडूनच नाही तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनही चूका होतात. त्यावेळी कारवाई केली जात का? असा सवालही प्राध्यापक संघटनेच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला.