शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कडक टाळेबंदीच्या शक्यतेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST

बारामती तालुक्यातील स्थिती: ‘वीकेंड लॉकडाऊन’चा फारसा परिणाम नाही बारामती: ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे भाजीपाला व फळभाज्यांचे विक्रीवर परिणाम झाल्याने फटका ...

बारामती तालुक्यातील स्थिती: ‘वीकेंड लॉकडाऊन’चा फारसा परिणाम नाही

बारामती: ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे भाजीपाला व फळभाज्यांचे विक्रीवर परिणाम झाल्याने फटका शेतकऱ्यांना बसला. मात्र दैनंदिन कामकाजावर तसेच खत-औषधे खरेदीवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र कडक टाळेबंदीच्या शक्यतेमुळे शेतमालाच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.

सततच्या संकटामुळे शेतकरी व शेती व्यवसायाची स्थिती गंभीर झाली आहे. मागील वर्षीच्या टाळेबंदीमधून सावरत असतानाच १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटीमध्ये हाहाकार माजवला होता. त्यानंतर शेतकरी सावरत असतानाच कोरोनाची दुसरी लाट व त्यामागून नव्याने येणाऱ्या टाळेबंदीमुळे शेती व्यवसाय पुन्हा भरडला जाणार आहे. कोरोना सावटामुळे तरकारी पिकांचे दर तर पडलेच, मात्र हमखास उत्पन्न देणाऱ्या फळबागांना यंदा निर्यातबंदीमुळे मोठा फटका बसला. निर्यातक्षम असणारी फळे स्थानिक बाजारात विकली गेल्याने त्याला अपेक्षित दर मिळाला नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली असतानाच वीजबिल वसुली, कर्जवसुली आदी प्रकारांमुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला. या काळामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा शासनाकडून होती. मात्र या अपेक्षा फोल ठरल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उन्हाळी अधिवेशनामध्ये सक्तीने वीजबिलवसुली होणार नाही, असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही सक्तीने वीजबिलाची वसुली होत राहिली. यावर शेतकरी संघटनेने बारामतीमध्ये रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन देखील केले.

एकीकडे शेतीचा उत्पादनखर्च वाढत जात असताना अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. खिशात भांडवलच नसल्याने आगामी खरिप हंगाम कसा साधायचा या विवंचनेत जिरायती शेतकरी आहे. तर फळबागांमधून उत्पादन खर्चाएवढे देखील उत्पन्न मिळाल्याने. पुन्हा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा या चिंतेने फळबागा उत्पादकांना ग्रासले आहे. शासकीय स्तरावरून सातत्याने हमीभावाबाबत अध्यादेश निघत असतात. मात्र त्या अध्यादेशांची अंमलबाजावणी होताना दिसत नाही.

---------------

भीक नको पण कुत्रं आवर...

टाळेबंदी लागली तरी आता आम्हाला शासनाकडून मदतीची अजिबात अपेक्षा नाही. शासन एक हाताने देते व दोन हातांनी काढून घेते हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. वीज बिल व कर्जवसुलीच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी असेच घडले. त्यामुळे आम्हाला मदत नको तर आमच्याकडून सक्तीने होणारी वसुली तेवढी थांबवावी. ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. फळबागा, दूध, ऊस, तरकारी माल उत्पादित करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची सध्याची अवस्था बिकट आहे. राज्य शासन वसुलीचे अध्यादेश प्रामाणिकपणे अमलात आणते, मात्र हमीभावाचे अध्यादेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आॅक्टोबर महिन्यात २०२१-२२ च्या उसाच्या एफआरपीची घोषणा केली जाते. आज सात महिने उलटले तरी राज्य शासन आगामी हंगामाच्या एफआरपीची घोषणा करत नाही. वसुलीसाठी शेतकऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारणारे शेतकऱ्यांना काही द्यायची वेळ आली की तोंडे फिरवतात.

- पांडुरंग रायते

जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना पुणे