शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचवी व आठवीची ...

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षासुद्धा रद्द केली जाऊ शकते, असा अंदाज शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात असला तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनामुळे परीक्षा २३ मे रोजी होणार आहे, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा जून महिन्यात घेता येऊ शकते का? याबाबत चाचपणी केली जात आहे.

दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा ही संख्या चांगलीच घटली आहे. पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली गेली आहे. इयत्ता पाचवीसाठी ३ लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून आठवीसाठी २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता ही संख्या निम्म्याने घटल्याचे दिसून येत आहे.

कोट

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन येत्या मे किंवा जून महिन्यात परीक्षा घेण्याचा विचार आहे. राज्य शासन इयत्ता बारावीच्या परीक्षा संदर्भात काय निर्णय घेते; याचा अभ्यास करून शासनाच्या निर्देशाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल.

- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद