शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू सेवाकरामुळे सकारात्मक बदल

By admin | Updated: June 21, 2017 06:18 IST

वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली, तरी सकारात्मक असून, यामुळे भारताची वेगाने प्रगती होईल, एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये(जीडीपी) ०.९ ते १.७ टक्के इतकी वाढ होऊ शकेल आणि सामान्य माणसाचे जीवन सुकर होईल, असे मत आंध्र प्रदेश अर्थ खात्याचे माजी मुख्य सचिव डॉ. व्ही. भास्कर यांनी वक्त केले.‘वस्तू आणि सेवाकर क्रांती - आव्हाने आणि संधी’ या विषयावर, पुणे इंटरनॅशनल सेंटर(पीआयसी) तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भास्कर बोलत होते. ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे सरव्यवस्थापक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते. डॉ.प्रमोद चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. भास्कर म्हणाले, सध्याची अप्रत्यक्ष करांची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि गोंधळाची आहे. करांवर कर, सेस, अनेक कर आणि सुमारे ४६ कर दर रचना असल्याने सामान्य माणूस आणि उत्पादक व सेवा पुरवठादार गोंधळात आहेत. राज्याने वस्तूंवर आणि सेवांवर केंद्राचा कर अशी अवघड प्रणाली आहे. ही रचना नव्या करामुळे सुरळीत होईल. करांवर कर नसल्याने हॉटेलिंग आणि घर घेणे थोडे स्वस्त होईल.ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये सध्या २३ टक्के लोक गरीब आहेत. शिक्षणावरचा खर्च कमी आहे आणि आरोग्यावरही, जगातल्या अनेक देशांपेक्षा कमी खर्च केला जातो. नीती आयोगाच्या अंदाजानुसार सध्याचा ७ टक्के विकासदर कायम राहिल्यास, २०३२ पर्यंत भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ५ टक्के असेल. मात्र २०३२ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या शून्य करायची असल्यास, भारताला विकास दर १० टक्क्यांपर्यंत वाढवावा लागेल. ‘वस्तू आणि सेवाकर’ आल्यामुळे वेगाने प्रगती होईल. परदेशी गुंतवणूक वाढेल. व्यवसाय सुलभ होईल, सगळी बाजारव्यवस्था एकसंध होईल, त्यामुळे विकास दरामध्ये वाढ होईल.