शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

वस्तू सेवाकरामुळे सकारात्मक बदल

By admin | Updated: June 21, 2017 06:18 IST

वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली, तरी सकारात्मक असून, यामुळे भारताची वेगाने प्रगती होईल, एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये(जीडीपी) ०.९ ते १.७ टक्के इतकी वाढ होऊ शकेल आणि सामान्य माणसाचे जीवन सुकर होईल, असे मत आंध्र प्रदेश अर्थ खात्याचे माजी मुख्य सचिव डॉ. व्ही. भास्कर यांनी वक्त केले.‘वस्तू आणि सेवाकर क्रांती - आव्हाने आणि संधी’ या विषयावर, पुणे इंटरनॅशनल सेंटर(पीआयसी) तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भास्कर बोलत होते. ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे सरव्यवस्थापक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते. डॉ.प्रमोद चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. भास्कर म्हणाले, सध्याची अप्रत्यक्ष करांची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि गोंधळाची आहे. करांवर कर, सेस, अनेक कर आणि सुमारे ४६ कर दर रचना असल्याने सामान्य माणूस आणि उत्पादक व सेवा पुरवठादार गोंधळात आहेत. राज्याने वस्तूंवर आणि सेवांवर केंद्राचा कर अशी अवघड प्रणाली आहे. ही रचना नव्या करामुळे सुरळीत होईल. करांवर कर नसल्याने हॉटेलिंग आणि घर घेणे थोडे स्वस्त होईल.ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये सध्या २३ टक्के लोक गरीब आहेत. शिक्षणावरचा खर्च कमी आहे आणि आरोग्यावरही, जगातल्या अनेक देशांपेक्षा कमी खर्च केला जातो. नीती आयोगाच्या अंदाजानुसार सध्याचा ७ टक्के विकासदर कायम राहिल्यास, २०३२ पर्यंत भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ५ टक्के असेल. मात्र २०३२ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या शून्य करायची असल्यास, भारताला विकास दर १० टक्क्यांपर्यंत वाढवावा लागेल. ‘वस्तू आणि सेवाकर’ आल्यामुळे वेगाने प्रगती होईल. परदेशी गुंतवणूक वाढेल. व्यवसाय सुलभ होईल, सगळी बाजारव्यवस्था एकसंध होईल, त्यामुळे विकास दरामध्ये वाढ होईल.