शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शिक्षण परीक्षेबाबत ‘पोरखेळ’ - मैदानावर चाचणी घेण्याचे निर्देश; दोन हजार विद्यार्थ्यांचे नियोजन कसे करायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST

शारीरिक शिक्षण विषयासाठी एकूण ५० गुण आहेत. त्यात २५ गुणांची लेखी आणि २५ गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते. ...

शारीरिक शिक्षण विषयासाठी एकूण ५० गुण आहेत. त्यात २५ गुणांची लेखी आणि २५ गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते. या विषयाची परीक्षा घेण्यासाठी शारीरिक शिक्षकांची नुकतीच झूम मिटिंग घेण्यात आली. त्यामध्ये शारीरिक शिक्षकांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून फारसे काहीच समाधानकारक चित्र पुढे आले नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मैदानावर परीक्षा घ्यायची कशी ? याबाबत काहीच माहिती दिली नाही. तसेच झूम मिटिंगमध्ये शिक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर याविषयीचे परिपत्रक टाकले आहे. त्यावरही दिनांक, मंडळाचा शिक्का किंवा कोणत्याच अधिकाऱ्याची सही नाही. त्यामुळे हे अधिकृत समजायचे का? असा प्रश्नही शिक्षकांना पडला आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे.

==================

२ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?

कोरोनाच्या काळात मैदानावर विद्यार्थी बोलावून परीक्षा घेणार कशी ? कारण एकत्र आले की गर्दी होऊ शकते. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका महाविद्यालयात २ हजार विद्यार्थी शारीरिक शिक्षणाची परीक्षा देणार आहेत. आता त्यांचे पंधरा-पंधरा जणांचे गट करून परीक्षा घेतली, तर त्याला किती दिवस लागतील. एकूणच हा पर्याय धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांची आहे.

=========

मैदानाऐवजी लेखीच परीक्षा घ्या

सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना मैदानावर बोलवून परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी सध्याच्या परिस्थितीत प्रात्यक्षिक परीक्षा न घेता फक्त लेखी परीक्षा घेऊन यंदाच्या वर्षी ग्रेड देण्यात याव्यात, असा पर्याय काही शिक्षकांनी सुचविला आहे. तसेच मैदानावर परीक्षा घेण्याला पालकांचा देखील विरोध आहे.

===========

कडक निर्बंधात परीक्षा घ्यावी का ?

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या महिन्यात सुरू होणाऱ्या परीक्षांबाबतही काय निर्णय होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. त्यातच, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबाबतही सरकार विचार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्येच या शारीरिक शिक्षण विषयावर परिक्षा घ्यावी, असे परिपत्रक आले आहे. त्यामुळे शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम आहे. एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलली, मग शारीरिक शिक्षणाची मैदानावर कशाला, असा सवालही उपस्थित होत आहे.