शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाणलोट क्षेत्रात पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: April 6, 2015 05:30 IST

मे महिना उजाडला, की जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येते. यंदा तर दरवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा धरणात

भोर / डिंभे : मे महिना उजाडला, की जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येते. यंदा तर दरवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे भाटघर, नीरा व कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष का करावा लागतोय, असा सवाल येथील जनता करीत आहे. पुरंदरमधील वीर धरणात ४०.४४ टक्के म्हणजे निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना वीरच्या कालव्याद्वारे ३१ मेपर्यंत शेतीला पाणी मिळणार आहे. मात्र धरण असणाऱ्या भोर तालुक्यातील शेतीला तर सोडाच पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरूझाली आहे. मे महिन्यात त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. भोरचा वापर फक्त पाणी साठवण्यासाठीच केला जातो काय, असा सवाल होत असून, पुढील काळात भोर, वेल्हाचे पाणी पेटणार अशीच अवस्था आहे. हीच परिस्थिती कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात आहे. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा आहे. ७.६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या प्रकल्पात १२ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर न झाल्यास यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असून, वाढती पाण्याची मागणी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कुकडी प्रकल्पातील पाण्याची पळवापळवी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याच्या ओढाताणीमुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येणार आहे. धरणाच्या आतील गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. भरलेली धरणे पुन्हा रिकामी होतात आणि दरवर्षी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरण खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. आमच्या पाण्यावर पूर्व भागातील तालुक्यातील शेती पिकून शेतकरी सुखी होत असताना आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, हे आमचे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे.