शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

अरणगावचा पूल धोकादायक

By admin | Updated: November 17, 2016 02:30 IST

वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

राहू : वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या बंधाऱ्याला कठडे नसल्याने कित्येक वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. गेली तीन वर्षांपूर्वी याच बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर कठडे नसल्याने नदीपात्रात कोसळला होता; परंतु कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याच बंधाऱ्यांच्या पूर्वकेडील बाजूस अरणगाव हद्दीत वाहने ये-जा होताना कठडा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याने या कठड्याची उंची कमी करणेकामी संबंधित खात्याने लक्ष घालण्याची जोरदार मागणी होत आहे. याच बंधाऱ्याच्या दोन्ही भाराव्यावर उपसा सिंचन योजनांचे पाईप फुटल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलावरून दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. (दि. १५) रोजी अरणगाव येथील यात्रा असल्याने एक युवक दुचाकीवरून याच बांधारूवरून जात असताना दुचाकी घसरून युवक पडला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. त्यामुळे या बंधाऱ्याच्या भराव्याचे काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे.याबाबत वडगावबांडे येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबूराव पिंगळे म्हणाले, की वस्तूत: याबाबत संबंधित खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या जीवितास धोका होत असताना संबंधित खात्याचे आधिकारी काय करतात, या कामाबाबत या खात्याने योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर, हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर उपोषणाचा इशारा दिला आहे.