शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अरणगावचा पूल धोकादायक

By admin | Updated: November 17, 2016 02:30 IST

वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

राहू : वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या बंधाऱ्याला कठडे नसल्याने कित्येक वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. गेली तीन वर्षांपूर्वी याच बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर कठडे नसल्याने नदीपात्रात कोसळला होता; परंतु कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याच बंधाऱ्यांच्या पूर्वकेडील बाजूस अरणगाव हद्दीत वाहने ये-जा होताना कठडा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याने या कठड्याची उंची कमी करणेकामी संबंधित खात्याने लक्ष घालण्याची जोरदार मागणी होत आहे. याच बंधाऱ्याच्या दोन्ही भाराव्यावर उपसा सिंचन योजनांचे पाईप फुटल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलावरून दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. (दि. १५) रोजी अरणगाव येथील यात्रा असल्याने एक युवक दुचाकीवरून याच बांधारूवरून जात असताना दुचाकी घसरून युवक पडला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. त्यामुळे या बंधाऱ्याच्या भराव्याचे काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे.याबाबत वडगावबांडे येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबूराव पिंगळे म्हणाले, की वस्तूत: याबाबत संबंधित खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या जीवितास धोका होत असताना संबंधित खात्याचे आधिकारी काय करतात, या कामाबाबत या खात्याने योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर, हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर उपोषणाचा इशारा दिला आहे.