शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

अरणगावचा पूल धोकादायक

By admin | Updated: November 17, 2016 02:30 IST

वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

राहू : वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या बंधाऱ्याला कठडे नसल्याने कित्येक वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. गेली तीन वर्षांपूर्वी याच बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर कठडे नसल्याने नदीपात्रात कोसळला होता; परंतु कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याच बंधाऱ्यांच्या पूर्वकेडील बाजूस अरणगाव हद्दीत वाहने ये-जा होताना कठडा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याने या कठड्याची उंची कमी करणेकामी संबंधित खात्याने लक्ष घालण्याची जोरदार मागणी होत आहे. याच बंधाऱ्याच्या दोन्ही भाराव्यावर उपसा सिंचन योजनांचे पाईप फुटल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलावरून दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. (दि. १५) रोजी अरणगाव येथील यात्रा असल्याने एक युवक दुचाकीवरून याच बांधारूवरून जात असताना दुचाकी घसरून युवक पडला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. त्यामुळे या बंधाऱ्याच्या भराव्याचे काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे.याबाबत वडगावबांडे येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबूराव पिंगळे म्हणाले, की वस्तूत: याबाबत संबंधित खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या जीवितास धोका होत असताना संबंधित खात्याचे आधिकारी काय करतात, या कामाबाबत या खात्याने योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर, हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर उपोषणाचा इशारा दिला आहे.