शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

गणेश विसर्जनासाठी तलाव तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची ...

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जबाबदारी पार पाडल्यास नदी, ओढे, नाल्यांचे जलप्रदूषण रोखले जाईल. अशी भूमिका तारुण्यवेध संघटनेने मांडली आहे.

पर्यावरणपूर्वक उत्सव साजरे करण्यासंबंधी राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मे २०११ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले, पण अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तारुण्यवेध संघटनेचे संघटक विशाल विमल, अध्यक्ष विकास पोखरकर, उपाध्यक्ष राहुल पोखरकर, रविराज थोरात यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीला या आदेशाचे स्मरणपत्र दिले आहे.

याबाबत विशाल विमल यांनी सांगितले की, विशेषत: घोडनदीत अनेक गावांचे सांडपाणी आणि कारखान्यामधील दूषित पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जित करून आणखी प्रदूषण करणे योग्य नाही. मूर्तीमध्ये पारा, शिसे आणि रासायनिक घटकाचे रंग असतात, त्याने अधिक पाणी प्रदूषित होते. काही गावांतील नागरिक नदीचे पाणी पितात. त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तसेच या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर त्याचा परिणाम होऊन शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नागरिकांनी हौदात गणपती विसर्जन करावे आणि नदीत निर्माल्य टाकू नये. त्यासाठी ग्रामपंचायतने व्यवस्था निर्माण करावी आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. ग्रामपंचायतने गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था करावी. तसेच, ठिकठिकाणी हौद उभारावेत. हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती आणि निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे या आदेशात म्हटले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पाणी लागले की, त्या दगडासारख्या घट्ट होतात. त्याच्यापासून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे शाडू अथवा मातीपासून बनविण्यात आलेल्या नैसर्गिक रंगाच्या मूर्तींच्या वापरास ग्रामपंचायतने प्रोत्साहन द्यावे. ग्रामपंचायतने ओला व सुका कचरा आणि निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था उभी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.