शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गणेश विसर्जनासाठी तलाव तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची ...

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जबाबदारी पार पाडल्यास नदी, ओढे, नाल्यांचे जलप्रदूषण रोखले जाईल. अशी भूमिका तारुण्यवेध संघटनेने मांडली आहे.

पर्यावरणपूर्वक उत्सव साजरे करण्यासंबंधी राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मे २०११ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले, पण अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तारुण्यवेध संघटनेचे संघटक विशाल विमल, अध्यक्ष विकास पोखरकर, उपाध्यक्ष राहुल पोखरकर, रविराज थोरात यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीला या आदेशाचे स्मरणपत्र दिले आहे.

याबाबत विशाल विमल यांनी सांगितले की, विशेषत: घोडनदीत अनेक गावांचे सांडपाणी आणि कारखान्यामधील दूषित पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जित करून आणखी प्रदूषण करणे योग्य नाही. मूर्तीमध्ये पारा, शिसे आणि रासायनिक घटकाचे रंग असतात, त्याने अधिक पाणी प्रदूषित होते. काही गावांतील नागरिक नदीचे पाणी पितात. त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तसेच या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर त्याचा परिणाम होऊन शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नागरिकांनी हौदात गणपती विसर्जन करावे आणि नदीत निर्माल्य टाकू नये. त्यासाठी ग्रामपंचायतने व्यवस्था निर्माण करावी आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. ग्रामपंचायतने गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था करावी. तसेच, ठिकठिकाणी हौद उभारावेत. हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती आणि निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे या आदेशात म्हटले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पाणी लागले की, त्या दगडासारख्या घट्ट होतात. त्याच्यापासून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे शाडू अथवा मातीपासून बनविण्यात आलेल्या नैसर्गिक रंगाच्या मूर्तींच्या वापरास ग्रामपंचायतने प्रोत्साहन द्यावे. ग्रामपंचायतने ओला व सुका कचरा आणि निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था उभी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.