शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पोखरी-ढाकाळे रस्त्याचा भराव खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला ...

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी दिला आहे.

आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा पोखरी-ढाकाळे हा रस्ता या वर्षी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचून जाऊन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही वर्षांपूर्वी गाडेकरवाडी व सुपेवाडी येथे टाकण्यात आलेले मातीचे भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे हा रस्ता तुटत चालला आहे. तर ठिकठिकाणी गाळाचे साम्राज्य झाल्यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, प्रशासन व राजकीय पुढारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रस्त्यावर असलेला चिखल व मोठमोठे खड्डे यामुळे वाहन चालविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे.

आंबेगाव व खेडच्या तालुक्याच्या हद्दीवर हा रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर दोन्ही तालुक्यांतील लोकांची नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या रस्त्यावर असणारी गाडेकरवाडी, सुपेवाडी, ढाकाळे, श्रीक्षेत्र गडदुबाई देवस्थान, गोहे बु., दांगटवाडीची वस्ती, उभेवाडी, बोरीचीवाडी, सायरखळा, बोरीचीवाडी, पाचवड, भोजणेवाडी, आव्हाट, वाळद, उगलेवाडी ही गावे येत असून, या रस्त्यावरुन ये जा करणारी वाहने ठप्प झाल्यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

१३ तळेघर

पोखरी-ढाकाळे या रस्त्याची झालेली दुरवस्था.