शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोखरी-ढाकाळे रस्त्याचा भराव खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला ...

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी दिला आहे.

आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा पोखरी-ढाकाळे हा रस्ता या वर्षी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचून जाऊन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही वर्षांपूर्वी गाडेकरवाडी व सुपेवाडी येथे टाकण्यात आलेले मातीचे भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे हा रस्ता तुटत चालला आहे. तर ठिकठिकाणी गाळाचे साम्राज्य झाल्यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, प्रशासन व राजकीय पुढारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रस्त्यावर असलेला चिखल व मोठमोठे खड्डे यामुळे वाहन चालविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे.

आंबेगाव व खेडच्या तालुक्याच्या हद्दीवर हा रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर दोन्ही तालुक्यांतील लोकांची नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या रस्त्यावर असणारी गाडेकरवाडी, सुपेवाडी, ढाकाळे, श्रीक्षेत्र गडदुबाई देवस्थान, गोहे बु., दांगटवाडीची वस्ती, उभेवाडी, बोरीचीवाडी, सायरखळा, बोरीचीवाडी, पाचवड, भोजणेवाडी, आव्हाट, वाळद, उगलेवाडी ही गावे येत असून, या रस्त्यावरुन ये जा करणारी वाहने ठप्प झाल्यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

१३ तळेघर

पोखरी-ढाकाळे या रस्त्याची झालेली दुरवस्था.