शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत ही राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:12 IST

याबाबत अधिकची माहिती अशी, की उरुळी कांचन ग्रामपंचायतीने १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उरुळी कांचन येथे ...

याबाबत अधिकची माहिती अशी, की उरुळी कांचन ग्रामपंचायतीने १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उरुळी कांचन येथे ५० बेडचे कोविड सेंटर चालू करणे बाबतच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या प्रतिउपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती हवेली यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे अथवा नामंजूर केले आहे अशा प्रकारचे कोणतेही लेखी पत्र ग्रामपंचायतीला अद्याप प्राप्त झालेले नाही.

कोविड सेंटर चालू करण्यासाठी उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फार्मसी कॉलेजचे होस्टेल अजिंक्य कांचन यांनी ग्रामपंचायतीला विनामोबदला देऊ केले होते तर ग्रामपंचायत हाऊसकीपिंग व रुग्णांच्या जेवणाचा, नाश्त्याचा खर्च करणार होती. आरोग्य विभागाकडून किरकोळ औषध पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती व स्थानिक खासगी सेंटर चालवणाऱ्या डॉक्टर मंडळींनी त्या ठिकाणी आपली वैद्यकीय सेवा प्रदान करण्याची तयारी दर्शवली असताना या कोविड सेंटरला जिल्हा प्रशासनाने मंजुरी न देता उरुळी कांचनच्या एक लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येचा विचार न करता, या भागात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांचा विचार न करता, त्यांना औषधोपचार मिळवण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय करत कोरेगाव मूळसारख्या पाच हजारांच्या आसपास लोकसंख्येच्या गावच्या मागणीला प्रतिसाद दिला. २ मेला स्थळ पाहणी करून ३ मेला कोविड सेंटर मंजूर झाल्याचे पत्र देऊन दहा तारखेला तेथे लोकप्रतिनिधींच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करून, उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर तसेच या गावांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर राजकीय आकसातून म्हणा किंवा प्रशासकीय अकार्यक्षमतेतून वा दबावाखाली येऊन अन्याय करून या महामारीच्या काळात एक वेगळाच पायंडा पाडून जनतेवर अन्याय केला आहे, अशी गंभीर टीका भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी केली आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गटविकास अधिकारी हे याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवत असतात. हे प्रस्ताव पाठवण्यासाठी एक कमिटी असते यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असतो त्यांनी शिफारस करून पाठवलेल्या प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी मंजुरी देऊन आदेश पारित करीत असतात.

या कमिटीत जर तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असेल तर ते उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आला का नाही, हे ठामपणाने का सांगू शकले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.