शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत ही राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:12 IST

याबाबत अधिकची माहिती अशी, की उरुळी कांचन ग्रामपंचायतीने १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उरुळी कांचन येथे ...

याबाबत अधिकची माहिती अशी, की उरुळी कांचन ग्रामपंचायतीने १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उरुळी कांचन येथे ५० बेडचे कोविड सेंटर चालू करणे बाबतच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या प्रतिउपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती हवेली यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे अथवा नामंजूर केले आहे अशा प्रकारचे कोणतेही लेखी पत्र ग्रामपंचायतीला अद्याप प्राप्त झालेले नाही.

कोविड सेंटर चालू करण्यासाठी उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फार्मसी कॉलेजचे होस्टेल अजिंक्य कांचन यांनी ग्रामपंचायतीला विनामोबदला देऊ केले होते तर ग्रामपंचायत हाऊसकीपिंग व रुग्णांच्या जेवणाचा, नाश्त्याचा खर्च करणार होती. आरोग्य विभागाकडून किरकोळ औषध पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती व स्थानिक खासगी सेंटर चालवणाऱ्या डॉक्टर मंडळींनी त्या ठिकाणी आपली वैद्यकीय सेवा प्रदान करण्याची तयारी दर्शवली असताना या कोविड सेंटरला जिल्हा प्रशासनाने मंजुरी न देता उरुळी कांचनच्या एक लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येचा विचार न करता, या भागात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांचा विचार न करता, त्यांना औषधोपचार मिळवण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय करत कोरेगाव मूळसारख्या पाच हजारांच्या आसपास लोकसंख्येच्या गावच्या मागणीला प्रतिसाद दिला. २ मेला स्थळ पाहणी करून ३ मेला कोविड सेंटर मंजूर झाल्याचे पत्र देऊन दहा तारखेला तेथे लोकप्रतिनिधींच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करून, उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर तसेच या गावांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर राजकीय आकसातून म्हणा किंवा प्रशासकीय अकार्यक्षमतेतून वा दबावाखाली येऊन अन्याय करून या महामारीच्या काळात एक वेगळाच पायंडा पाडून जनतेवर अन्याय केला आहे, अशी गंभीर टीका भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी केली आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गटविकास अधिकारी हे याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवत असतात. हे प्रस्ताव पाठवण्यासाठी एक कमिटी असते यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असतो त्यांनी शिफारस करून पाठवलेल्या प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी मंजुरी देऊन आदेश पारित करीत असतात.

या कमिटीत जर तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असेल तर ते उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आला का नाही, हे ठामपणाने का सांगू शकले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.