शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

राजकारणाने गावाचा विकास खुंटला

By admin | Updated: March 9, 2015 00:56 IST

‘‘राज्याचे मुख्यमंत्री कोणी सोलापूरचे, कोणी साताऱ्याचे, तर कोणी बारामतीचे झाले, मात्र आजवर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही.

वाकड : ‘‘राज्याचे मुख्यमंत्री कोणी सोलापूरचे, कोणी साताऱ्याचे, तर कोणी बारामतीचे झाले, मात्र आजवर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही. अन्यथा आजचे चित्र वेगळे असते. गावानुसार राजकीय आडाखे ठरतात. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विकास झाला नाही. मात्र, येत्या काळात पारंपरिक सिंचन पद्धतीत निश्चितच आमूलाग्र बदल घडविणार आहे,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. सिंचन सहयोग आणि अभिनव फार्म्स क्लब, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे (ता. मुळशी) येथील आयोजित १६व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, दि.बा. मोरे, जालिंदर जाधव, अभिनव क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, उपाध्यक्ष कैलास जाधव, मुळशीचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, नेरे गावचे सरपंच, हिंजवडीचे सरपंच श्यामराव हुलावळे, सुरेश हुलावळे, वंदे मातरम शेतकरी संघटनेचे जनार्दन पायगुडे यांच्यासह जलसंपदा व कृषी विभागातील अधिकारी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर प्रमोद मांडेकर (चांदे), स्वाती अरविंद शिंगाडे (सोनकसवाडी, बारामती), अंकुश पडवळे (मंगळवेढा) यांना प्रयोगशील पुरुष व महिला शेतकरी, तसेच उत्कृष्ट सिंचन सहयोग कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जयेश पाटील यांना एल. सी. कोकीळ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोकुळ पाटील, किशोर मठपती, गिरीश डांगे, ज्ञानेश्वर शेंद्रे आदींना सिंचन कार्यासाठी प्रशस्तिपत्रक देण्यात आले. तर अभिनव क्लबचे उपाध्यक्ष कैलास जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘मी शेतकरी मी उद्योजक’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या सत्रात पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अनुभवकथन झाले. दुसऱ्या सत्रात सूक्ष्म सिंचनाचा शास्त्रीय पद्धतीने वापर या विषयावर कार्यशाळा, तर तिसऱ्या सत्रात पणन व अर्थव्यवस्था आदी विषयांवर विचारमंथन झाले. प्रशांत आडे आणि अशोक पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)