शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीवाढीला राजकीय विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:43 IST

संपूर्ण शहराला येत्या ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी पाणीपट्टीमध्ये २२.५ टक्क्यांनी वाढ करण्याच्या आयुक्त कुणाल कुमार

पुणे : संपूर्ण शहराला येत्या ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी पाणीपट्टीमध्ये २२.५ टक्क्यांनी वाढ करण्याच्या आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांनी विरोध दर्शविला आहे. स्थायी समितीकडून पाणीपट्टीमध्ये सुचविलेली वाढ फेटाळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये सुचविलेली महत्त्वाकांक्षी २४ तास पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अडचणीत आले आहे.शहराला २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्यासाठी कुणाल कुमार यांनी अडीच हजार कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडला आहे. त्यांनी आगामी २०१६-१७ साठी मांडलेल्या अंदाजपत्रकामध्येही या योजनेसाठी निधी राखून ठेवला आहे. त्याचबरोबर, प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शहरला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी अंदाजपत्रकामध्ये पाणीपट्टीत आगामी वर्षात २२.५ टक्के तसेच पुढील प्रत्येक वर्षी ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी दुपारी स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. शहराच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचा भार पुणेकरांवर टाकण्याऐवजी राज्य व केंद्र शासनांच्या निधीतून खर्च करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. पाणीपट्टीमध्ये वाढ होऊ नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे स्थायी समितीकडून पाणीपट्टीवाढीला मंजुरी मिळणे अवघड बनले आहे.शहराच्या २०४७पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. त्या वेळी शहराची लोकसंख्या ७३ लाख ७५ हजार असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्याच्या साठवण टाक्यांची क्षमता कमी असणे, वितरणव्यवस्था योग्य नसणे, पाणीपुरवठा कालावधी व प्रेशर यांमध्ये तफावत असणे, जुन्या वितरण नलिकांमधील लिकेजेस; त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी या प्रमुख त्रुटी प्रस्तावित योजनेअंतर्गत दूर केल्या जाणार आहेत. नवीन जलकेंद्र उभारणे, वितरणव्यवस्था सुधारणे यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. प्रत्येक घराला मीटरने पाणीपुरवठा करायचा असल्याने त्यासाठी मोठा निधी लागणार आहे.