शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

केंदूर-पाबळ गटात राजकीय समीकरणांना वेग

By admin | Updated: January 22, 2017 04:36 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, आंबेगावला जोडलेला केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट, कान्हूर मेसाई, रांजणगाव

शिक्रापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, आंबेगावला जोडलेला केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट, कान्हूर मेसाई, रांजणगाव व टाकळी हाजी गटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजपा, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत या तिन्ही गटांत पाहावयास मिळत आहे. मागील निवडणुकीत या तिन्ही गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. तर, पंचायत समितीत केंदूर पंचायत समिती भाजपाने ताब्यात घेतली होती. राजकीय डावपेचांत सध्या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या तिन्ही गटांत आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रमुख पक्षांबरोबरच भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी भाजपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, जिल्हा स्तरावरून काँग्रेसने या तिन्ही गटांत आपले उमेदवार उतरवण्याची जय्यत तयारी केली आहे. या भागात मनसेचे वर्चस्व कमी असले, तरी उमेदवार उभे करण्यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन तर काही अपक्ष चिन्हांवर उमेदवारी मिळवून निवडणूक लढवताना ऐन वेळी राजकीय कोलांटउड्या या गटांत दिसण्याची शक्यता आहे. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीबरोबरच गट व गणातील कार्यकर्त्यांना जवळ घेऊन दबावतंत्राचा वापर करून कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार असून, भाजपा-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती झाली नाही, तर या तिन्ही गटांत अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. (वार्ताहर)ग्रामीण भागात वाढली हायटेक प्रचार यंत्रणागेल्या १५ वर्षांत जि.प., पंचायत समिती निवडणूक प्रचारात आमूलाग्र बदल झाला असून, भोंगागाडी, पत्रके याचबरोबर भिंतीवरील जाहिरातींनी बदल केला असून, सोशल मीडियावर इच्छुकांनी भर देत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून व वृत्तपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मोबाईल मेसेज व व्हॉईस रेकॉर्ड मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.