शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भूत उतरविणाऱ्या मांत्रिकासह तीन महिलांना पोलीस कोठडी

By admin | Updated: March 15, 2016 03:52 IST

भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

पिंपरी : भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या तीन महिलांना देहूरोड पोलिसांनी घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनी उमेश जेगरे (वय २६, रा. शिवाजीनगर, देहूरोड) या महिलेने मांत्रिकासह तीन आरोपी महिलांविरुद्ध रविवारी फिर्याद दाखल केली. दुसऱ्याच दिवशी सोमवारी देहूरोड पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडले. भीमप्पा शंकरप्पा कुंचीकर या मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या नंदा खुडे (वय ५१), संगीता धनराज शिंदे (वय ४१), मीना प्रशांत कदम (वय ५५) या तीन महिलांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. अंधश्रद्धा बाळगून भूत उतरविण्यासाठी महिलेला मारहाण करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. देहूरोड परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर झोपडपट्टीतील मरिमाता मंदिरात तीन महिलांच्या मदतीने मांत्रिकाने सोनी जेगरे या महिलेला मारहाण केली. तिला भुताने झपाटले आहे, असे सांगून भूत उतरविण्यासाठी तिचे केस ओढले. डोळ्यांत, कानात, नाकात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळले. या अघोरी कृत्याविरोधात त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील काही बिल्डरांनी दौंड, कुरकुंभ येथे मांत्रिकाच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. त्या बिल्डरांना गुंगीचे औषध पाजून मांत्रिकाने शिष्यासह पलायन केले. १० मार्चला घडलेल्या या घटनेनंतर १४ मार्चला देहूरोडमध्ये घडलेल्या मांत्रिकाच्या मदतीने भूत उतरविण्याच्या या घटनेने या भागातील नागरिकांवर अद्यापही अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)अंधश्रद्धेचे वाढते प्रकारशहर परिसरामध्ये बुवाबाजीचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक लोकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर याला अशिक्षित नागरिकांबरोबर सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येऊनही संबंधित बुवांच्या विरोधात कोणतीही तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांत वाढच होत आहे. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.