शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद?

By admin | Updated: June 10, 2014 23:34 IST

पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे.

पुणे : पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांनी तक्रारींची दखल न घेतल्यास त्याविरूध्द नागरिकांना थेट दाद मागता यावी म्हणून गेल्या ५ वर्षापासून पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जनता दरबार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी ४ वाजता पोलीस आयुक्त स्वत: नागरिकांना भेटून त्यांच्या तक्रारी जाणून घेत असत. मात्र पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. नागरिकांना पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून व्यवस्थित वागणूक न मिळत असल्याच्या वारंवार तक्रारी पोलीस आयुक्तांकडे येत होत्या. यापार्श्वभुमीवर तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी जनता दरबार सुरू केला. त्यांची बदली झाल्यानंतर मीरा बोरवणकर व गुलाबराव पोळ यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवला होता. थेट आयुक्तांना भेटून आपले गार्‍हाणे मांडता येत असल्याने नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत होता. नागरिकांच्या तक्रार अर्जानुसार लगेच संबंधित पोलीस अधिकार्‍यास फोन शहानिशा केली जात होती. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत होती. पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्‍यांवर जनता दरबाराचा मोठा वचक निर्माण झाला होता. गुलाबराव पोळ यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदली झाल्यानंतर सतीश माथूर पुण्यात बदलून आले. मात्र त्यांनी जनता दरबारामध्ये सहभागी होणे टाळले आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जनता दरबारामध्ये तक्रारी ऐकूण घेण्याचे काम पोलीस उपायुक्त किंवा सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. त्यांच्या समकक्ष असणार्‍या अधिकार्‍यांबदद्ल नागरिकांनी तक्रारी केल्यास ते यास न्याय देऊ शकतील का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तसेच त्यामुळे जनता दरबाराचे महत्त्वच संपुष्टात आले आहे.दरबार राजाचा असतोपोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'जनता दरबार ही संकल्पनाच मला मान्य नाही, दरबार हा राजाचा असतो. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मी नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी उपलब्ध असतो. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे भेटून मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतो.'