शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:41 IST

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे.

पुणे  - कवितेत लय येण्यासाठी कवीच्या जगण्यात लय यावी लागते. प्रतिकांचा आणि प्रतिमांचा शोध घ्यावा लागतो. वास्तवाचं आणि समाजाचं भान कविला असलंच पाहिजे. जगणं समृद्ध झालं तरच कविता प्रगल्भ होते. कविता आणि गीत वेगळे नसतात. कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. कवितांचा बाजार झालाय असे मत डॉ. नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी कवयित्री’ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थति होत्या.कवितेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडून कवींनी अनेक दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही कवींनी दिलेली समर्पक आणि चिंतनशील उत्तरांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. गदिमा आणि खेबूडकर हे उत्तम कवीच आहेत. समीक्षकांना ते कवी का वाटत नाहीत? कविता जगण्याला चिकटून आली की ती कसदार होते. कवी व सामान्य माणूस वेगळा नसतो. मनाचा शोध कविला घ्यावा लागतो, कवितेत भेदभाव असू नयेत. कविता मंचावर जास्त आलीपाहिजे. याकडे नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी लक्ष वेधले.सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.माझा कवितेत ‘वेदनेचा पाऊस’नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘कविता लिहिताना माझ्यातला समीक्षककधी आडवा आला नाही. परंतू कविता एखाद्या मासिकाला पाठवताना माज्यातला समीक्षक जागा होत असे त्यामुळे त्या कवितेलासमीक्षेच्या अंगाने पाहूनच ती कविता पाठवत होते. माझ्या कवितेतला आशय निसर्ग आणि स्त्री हा आहे. त्यामुळे ‘पक्षी’, ‘आजचा हॅम्लेट’, ‘अंतर्नाद’, ‘हे ईश्वर’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘ती’ या कवितांमधून मधून दिसून येतो.माझ्या कविता या काळानुसार बदलत आलेल्या आहे.कवीचं जगणं समृद्ध होत जाते तशी कविता समृद्ध होत जाते. सभोताली अनेक घडामोडी घडत असतात कवीने त्याकडे फक्तसूक्ष्मदृष्टीने पहिले पाहिजे. माज्या कवितांमध्ये समाजातील दु:ख आणि वेदना आलेल्या आहे. त्यामुळे माझा कविता ‘वेदनेचा पाऊस’, ‘तुझ्यासोबत’, ‘सर्वकालीन प्रार्थना’, ‘राष्ट्रवाद’, ‘हत्ती इलो’, ‘आवण ओल’ या मधून तो दिसून आहे. - अजय कांडर

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या