शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:41 IST

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे.

पुणे  - कवितेत लय येण्यासाठी कवीच्या जगण्यात लय यावी लागते. प्रतिकांचा आणि प्रतिमांचा शोध घ्यावा लागतो. वास्तवाचं आणि समाजाचं भान कविला असलंच पाहिजे. जगणं समृद्ध झालं तरच कविता प्रगल्भ होते. कविता आणि गीत वेगळे नसतात. कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. कवितांचा बाजार झालाय असे मत डॉ. नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी कवयित्री’ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थति होत्या.कवितेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडून कवींनी अनेक दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही कवींनी दिलेली समर्पक आणि चिंतनशील उत्तरांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. गदिमा आणि खेबूडकर हे उत्तम कवीच आहेत. समीक्षकांना ते कवी का वाटत नाहीत? कविता जगण्याला चिकटून आली की ती कसदार होते. कवी व सामान्य माणूस वेगळा नसतो. मनाचा शोध कविला घ्यावा लागतो, कवितेत भेदभाव असू नयेत. कविता मंचावर जास्त आलीपाहिजे. याकडे नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी लक्ष वेधले.सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.माझा कवितेत ‘वेदनेचा पाऊस’नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘कविता लिहिताना माझ्यातला समीक्षककधी आडवा आला नाही. परंतू कविता एखाद्या मासिकाला पाठवताना माज्यातला समीक्षक जागा होत असे त्यामुळे त्या कवितेलासमीक्षेच्या अंगाने पाहूनच ती कविता पाठवत होते. माझ्या कवितेतला आशय निसर्ग आणि स्त्री हा आहे. त्यामुळे ‘पक्षी’, ‘आजचा हॅम्लेट’, ‘अंतर्नाद’, ‘हे ईश्वर’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘ती’ या कवितांमधून मधून दिसून येतो.माझ्या कविता या काळानुसार बदलत आलेल्या आहे.कवीचं जगणं समृद्ध होत जाते तशी कविता समृद्ध होत जाते. सभोताली अनेक घडामोडी घडत असतात कवीने त्याकडे फक्तसूक्ष्मदृष्टीने पहिले पाहिजे. माज्या कवितांमध्ये समाजातील दु:ख आणि वेदना आलेल्या आहे. त्यामुळे माझा कविता ‘वेदनेचा पाऊस’, ‘तुझ्यासोबत’, ‘सर्वकालीन प्रार्थना’, ‘राष्ट्रवाद’, ‘हत्ती इलो’, ‘आवण ओल’ या मधून तो दिसून आहे. - अजय कांडर

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या