शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:41 IST

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे.

पुणे  - कवितेत लय येण्यासाठी कवीच्या जगण्यात लय यावी लागते. प्रतिकांचा आणि प्रतिमांचा शोध घ्यावा लागतो. वास्तवाचं आणि समाजाचं भान कविला असलंच पाहिजे. जगणं समृद्ध झालं तरच कविता प्रगल्भ होते. कविता आणि गीत वेगळे नसतात. कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. कवितांचा बाजार झालाय असे मत डॉ. नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी कवयित्री’ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थति होत्या.कवितेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडून कवींनी अनेक दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही कवींनी दिलेली समर्पक आणि चिंतनशील उत्तरांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. गदिमा आणि खेबूडकर हे उत्तम कवीच आहेत. समीक्षकांना ते कवी का वाटत नाहीत? कविता जगण्याला चिकटून आली की ती कसदार होते. कवी व सामान्य माणूस वेगळा नसतो. मनाचा शोध कविला घ्यावा लागतो, कवितेत भेदभाव असू नयेत. कविता मंचावर जास्त आलीपाहिजे. याकडे नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी लक्ष वेधले.सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.माझा कवितेत ‘वेदनेचा पाऊस’नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘कविता लिहिताना माझ्यातला समीक्षककधी आडवा आला नाही. परंतू कविता एखाद्या मासिकाला पाठवताना माज्यातला समीक्षक जागा होत असे त्यामुळे त्या कवितेलासमीक्षेच्या अंगाने पाहूनच ती कविता पाठवत होते. माझ्या कवितेतला आशय निसर्ग आणि स्त्री हा आहे. त्यामुळे ‘पक्षी’, ‘आजचा हॅम्लेट’, ‘अंतर्नाद’, ‘हे ईश्वर’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘ती’ या कवितांमधून मधून दिसून येतो.माझ्या कविता या काळानुसार बदलत आलेल्या आहे.कवीचं जगणं समृद्ध होत जाते तशी कविता समृद्ध होत जाते. सभोताली अनेक घडामोडी घडत असतात कवीने त्याकडे फक्तसूक्ष्मदृष्टीने पहिले पाहिजे. माज्या कवितांमध्ये समाजातील दु:ख आणि वेदना आलेल्या आहे. त्यामुळे माझा कविता ‘वेदनेचा पाऊस’, ‘तुझ्यासोबत’, ‘सर्वकालीन प्रार्थना’, ‘राष्ट्रवाद’, ‘हत्ती इलो’, ‘आवण ओल’ या मधून तो दिसून आहे. - अजय कांडर

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या