शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडविते : डॉ. अश्विनी धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:11 IST

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी ...

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी असते; परंतु महाराष्ट्रात काव्यसंग्रहांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’, ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींचे शब्दक्रांती कविसंमेलन या ‘त्रिवेणी संगम’ विशेष कार्यक्रमात डॉ. धोंगडे बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, अरुण बोराडे, संयोजक संदीप कांबळे, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील पलूसचे रानकवी नामदेव जाधव यांना डॉ. धोंगडे यांच्या हस्ते ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन झाले.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, ‘समाजाचे दुःख पेलण्याची ताकद कवितेमध्ये असते. प्रत्येक कवितेतून काहीतरी विचार द्यायला हवा. नामदेव जाधव व चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या संवेदनशील मनातून या कविता साकारल्या आहेत. त्यांना ईश्वराने दिलेली शब्दांची प्रतिभा अफाट आहे.’

नामदेव जाधव यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि रानमातीचा असून, या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करतो, असे सांगितले. डॉ. अशोक कुमार पगारिया, अरुण बोराडे, चंद्रकांत वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी प्रास्ताविक, तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - त्रिवेणी संगम