शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडविते : डॉ. अश्विनी धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:11 IST

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी ...

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी असते; परंतु महाराष्ट्रात काव्यसंग्रहांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’, ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींचे शब्दक्रांती कविसंमेलन या ‘त्रिवेणी संगम’ विशेष कार्यक्रमात डॉ. धोंगडे बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, अरुण बोराडे, संयोजक संदीप कांबळे, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील पलूसचे रानकवी नामदेव जाधव यांना डॉ. धोंगडे यांच्या हस्ते ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन झाले.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, ‘समाजाचे दुःख पेलण्याची ताकद कवितेमध्ये असते. प्रत्येक कवितेतून काहीतरी विचार द्यायला हवा. नामदेव जाधव व चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या संवेदनशील मनातून या कविता साकारल्या आहेत. त्यांना ईश्वराने दिलेली शब्दांची प्रतिभा अफाट आहे.’

नामदेव जाधव यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि रानमातीचा असून, या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करतो, असे सांगितले. डॉ. अशोक कुमार पगारिया, अरुण बोराडे, चंद्रकांत वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी प्रास्ताविक, तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - त्रिवेणी संगम