शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

माणूसपणाचे मोल सांगणारी कविता

By admin | Updated: January 2, 2015 01:07 IST

नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.

पुणे : नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांचे बालमित्र बाळासाहेब बनसोडे यांच्य हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते. या वेळी ‘माझ्या हाती लेखणी नसती तर’ या विषयावर गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. बाळ म्हणाल्या, ‘‘अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची साधने बदलू शकतात. नागराज मंजुळे यांनी कवितेतून व्यक्त केलेल्या अभिव्यक्तीतून त्यांचा संघर्ष समोर येतो.’’बनसोडे यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यामागची भूमिका सांगताना मंजुळे म्हणाले, ‘‘मी एकच कविता लिहिली होती तेव्हा बाळासाहेब यांनी पत्रिकेत माझी ओळख कवी आणि लेखक करून दिली होती. माझ्या हातात लेखणी नसती तरी कशानेही का होईना मनातील संघर्ष उपसतच बसलो असतो.’’व्यवस्थेने हजारो नागराज गाडले गेल्यावर नागराज मंजुळे नावाचा आयकॉन उभा राहिला आहे, असे सांगून डॉ. आवटे यांनी नागराज मंजुळे एका परिप्रेक्ष्यात वाढत असताना त्यांना गवसलेल्या शब्दकळेबद्दल विवेचन केले. श्रीरंजन आवटे यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)नागराजची कविता ही विद्रोही नाही तर संयत आणि समंजस आहे. त्याचे माणूसपण हे मला त्याच्यातील दिग्दर्शक किंवा कवीपेक्षाही मोठे वाटते.- उमेश कुलकर्णी